मोबाईलला आधार क्रमांक जोडणे हे कोणत्याही व्यक्तीच्या खासगी अधिकारांचे उल्लंघन करणारी बाब असल्याचे सांगत बॅनर्जी यांनी आधारसक्तीला विरोध दर्शवला. दोनच दिवसांपूर्वी त्यांनी आपण मोबाईलशी आधार क्रमांक जोडणार नाही, त्यामुळे आपला मोबाईल क्रमांक बंद झाला तरी चालेल, अशी भूमिका व्यक्त केली होती. त्याचबरोबर आपल्याप्रमाणे इतरांनीही या आधारसक्तीला विरोध करावा असे आवाहन त्यांनी केले होते. त्यानुसार, ममता बॅनर्जी यांनी आधारसक्तीविरोधात थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.