Festival Posters

होय, मोदी सरकार ही सुटबूटवाल्यांचीच !

Updated: शनिवार, 20 ऑक्टोबर 2018 (07:53 IST)
 
अवघा महाराष्ट्र दुष्काळाने होरपळत असताना शेतकऱ्यांवर भले मोठे कर्ज झाले होते. सरकारने कर्जमाफीची घोषणा केली मात्र अद्यापही शेतकऱ्यांना कर्जमाफीची रक्कम मिळालेली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना दुप्पट हमीभाव देण्याची घोषणा केली होती मात्र शेतकऱ्यांच्या पिकांना अद्याप भाव नाही. मध्यंतरी विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकरी बोंडअळी, मावा, तुडतुड्या या रोगांमुळे त्रस्त होता. सरकारने मदतीची घोषणा केली मात्र अद्यापही शेतकरी मदतीची वाट पाहत आहेत. कामगारांचे प्रश्नीही गंभीर झाले आहेत. सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे कामगार कायदा धोक्यात आला असल्याची चिंता खा. शरद पवार यांनी एका मेळाव्यात बोलून दाखवली होती. अशी परिस्थिती असताना दुसरीकडे अनेक बडे उद्योगपती बँकांचे लाखो करोडो रुपयांचे कर्ज बुडवत परदेशी फरार होत आहेत. नीरव मोदी, विजय मल्ल्या, मेहुल चौक्सी अशी कर्जबुडव्यांची मोठी यादीच आहे, मात्र सरकार त्यांच्यावर कोणतीही कारवाई करताना दिसत नाही. त्यामुळे 'होय, मोदी सरकार हे सुटबूटवाल्यांचंच' असं जनतेने म्हणणे स्वभाविकच आहे.

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

पुढील लेख
Show comments