संबंधित माहिती
- Video: जम्मू-काश्मीरच्या गांदरबलमध्ये पुन्हा बर्फाचे वादळ, लोक घाबरून बंकरमध्ये घुसले
- महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर मित्रासमोर सामूहिक बलात्कार, आरोपीने दिली चाकूच्या धाकावर धमकी
- इकबाल सिंह चहल यांच्यावर आधी कौतुकाची थाप, आता ईडीने दिली हाक
- केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना जीवे मारण्याची धमकी, त्यांच्या कार्यालयात दोनदा फोन आला, पोलिसांनी सुरक्षा वाढवली
- मेरठ :तरुणाने विद्यार्थिनीवर बसमध्ये गोळी झाडली
द्वेष पसरवणाऱ्या अँकर्सना दूर करा- सर्वोच्च न्यायालयाने वृत्तवाहिन्यांना फटकारलं
वृत्तवाहिन्यांवर प्रत्येक गोष्ट टीआरपीसाठी सुरु असून, यासाठी वाहिन्यांमध्ये स्पर्धा आहे. संवेदनशील मुद्यांचा अजेंडा ठरवला जातो. मात्र आपल्या कार्यक्रमांमधून समाजात द्वेष पसरवला जात असेल अशा वृत्तनिवेदकांना पडद्यावरून दूर केलं पाहिजे अशा स्पष्ट शब्दात सर्वोच्च न्यायालयाने वृत्तवाहिन्यांना फटकारलं आहे. 'सामना'ने ही बातमी दिली आहे.
युपीएससी जिहाद, कोरोना जिहाद, तबलगी जमात, धर्म संसद आदी द्वेषपूर्ण भाषणांचे संदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. द्वेष पसरवणारी भाषणं आणि त्यावर कार्यक्रम घेण्यास, प्रसारण करण्यास वृत्तवाहिन्यांनी रोख लावावी अशी मागणी करण्यात आली. न्यायमूर्ती के.एम. जोसेफ आणि न्यायमूर्ती बी.व्ही.नागरत्ना यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली.
Published By- Priya Dixit