संबंधित माहिती
- महाराष्ट्र परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी MSRTC बसेससाठी इंधन बचत मोहीम सुरू केली
- ST चा प्रवास महागणार? मागील १० दिवसांत ४ वेळा डिझेल दरवाढीमुळे लालपरी संकटात; ३१० कोटींचा बोजा!
- LIVE: महाराष्ट्रात MSRTC चे NCMC स्मार्ट कार्ड सुरू झाले
- महाराष्ट्रात MSRTC कडून प्रवाशांच्या सोयीसाठी NCMC स्मार्ट कार्ड सादर
- जळगाव नंतर आता रायगडमध्ये एसटी बसचा अपघात: ब्रेक निकामी झाल्याने दरीत कोसळण्यापासून थोडक्यात बचावली, प्रवासी गंभीर जखमी
बरडोलीमध्ये MSRTC च्या दोन बसचा भीषण अपघात; ७ जणांचा मृत्यू तर ४० जण जखमी
मंगळवारी गुजरातच्या सुरत जिल्ह्यातील बारडोली शहराजवळ महाराष्ट्र राज्य महामंडळाच्या दोन बसची टक्कर होऊन भीषण आग लागली. यामध्ये सात जणांचा मृत्यू झाला आणि सुमारे ४० जण जखमी झाले. अशी माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी गुजरातच्या सुरत जिल्ह्यातील बारडोली शहराजवळ महाराष्ट्र राज्य रस्ते वाहतूक महामंडळाच्या दोन बसची टक्कर होऊन सात जणांचा मृत्यू झाला आणि सुमारे ४० जण जखमी झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यामध्ये एका बसला आग लागली. घटना राष्ट्रीय महामार्ग ५३ वर घडली. माहिती समोर आली आहे की, एक बस सुरतहून धुळेकडे जात होती, तर दुसरी चाळीसगावहून सुरतच्या दिशेने येत होती.
अधिकारींनी सांगितले की, एका बसची ट्रॅक्टरला धडक बसली. संतुलन बिघडल्याने बस डिव्हायडर ओलांडून महाराष्ट्रातून येणाऱ्या दुसऱ्या बसला धडकली, ज्यामुळे ट्रॅक्टर उलटून रस्त्याच्या कडेला असलेल्या सखल भागात पडला. बसला आग लागली. बसमध्ये अडकलेल्या अनेक प्रवाशांना वाचवले आणि जखमींना तातडीने बार्डोली रुग्णालयात दाखल केले. दोन्ही बसमधील सुमारे ४० जण जखमी झाले, तर सात जणांचा मृत्यू झाला. मृत झालेले सर्वजण आग लागलेल्या बसमध्ये होते.
मुंबईत, राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी बस अपघाताला "अत्यंत दुःखद आणि वेदनादायी" म्हटले असून, मृतांच्या कुटुंबीयांना १० लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली.
Edited By- Dhanashri Naik
मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी गुजरातच्या सुरत जिल्ह्यातील बारडोली शहराजवळ महाराष्ट्र राज्य रस्ते वाहतूक महामंडळाच्या दोन बसची टक्कर होऊन सात जणांचा मृत्यू झाला आणि सुमारे ४० जण जखमी झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यामध्ये एका बसला आग लागली. घटना राष्ट्रीय महामार्ग ५३ वर घडली. माहिती समोर आली आहे की, एक बस सुरतहून धुळेकडे जात होती, तर दुसरी चाळीसगावहून सुरतच्या दिशेने येत होती.
अधिकारींनी सांगितले की, एका बसची ट्रॅक्टरला धडक बसली. संतुलन बिघडल्याने बस डिव्हायडर ओलांडून महाराष्ट्रातून येणाऱ्या दुसऱ्या बसला धडकली, ज्यामुळे ट्रॅक्टर उलटून रस्त्याच्या कडेला असलेल्या सखल भागात पडला. बसला आग लागली. बसमध्ये अडकलेल्या अनेक प्रवाशांना वाचवले आणि जखमींना तातडीने बार्डोली रुग्णालयात दाखल केले. दोन्ही बसमधील सुमारे ४० जण जखमी झाले, तर सात जणांचा मृत्यू झाला. मृत झालेले सर्वजण आग लागलेल्या बसमध्ये होते.
ALSO READ: महाराष्ट्र एटीएस आणि दिल्ली पोलिसांची संयुक्त कारवाई; संशयित दहशतवादी हुजैफाला मुंबईतून अटक
Edited By- Dhanashri Naik