या 'चुकीने' इंद्रायणी नदीचा पूल कोसळला, प्रशासनाने दिला होता इशारा, मंत्री गिरीश महाजनांनी स्पष्ट केले
पुण्यातील इंद्रायणीवरील जुना पूल रविवारी अचानक कोसळला. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला तर 51 जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातानंतर सध्या विविध रुग्णालयांमध्ये जखमींवर उपचार सुरू असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
पर्यटकांना आवडणारा हा पूल आजूबाजूच्या गावांना जोडणारा जुना, अंदाजे 30 वर्षांपूर्वीचा लोखंडी साकव होता. स्थानिक प्रशासनाच्या प्राथमिक अहवालानुसार, सुमारे 100 ते 125 पर्यटक पुलावर उपस्थित होते. पावसामुळे नदीच्या पात्रात पाण्याची पातळी वाढत असतानाही काही पर्यटक पूल ओलांडत होते. त्याचवेळी पूल अचानक कोसळला.
राज्य सरकारने मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. तर जखमींच्या उपचाराचा खर्चही राज्य सरकार उचलेल. असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितले आहे.
परदेशी दौऱ्यावर असलेले पंतप्रधांनी या अपघातावर दुःख व्यक्त केले असून त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांशी फोनवरून संवाद साधला.पंतप्रधांनानी राज्य सरकारला मदतकार्यात आवश्यक ती सर्व मदत करण्याचे आश्वासन दिले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ही अपघाताबद्दल दुःख व्यक्त केले आणि मुख्यमंत्री फडणवीसांशी बोलून परिस्थतीतीची माहिती घेतली.
इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्यानंतर महाराष्ट्र सरकारमधील मंत्री गिरीश महाजन घटनास्थळी पोहोचले. अपघाताचे कारण स्पष्ट करताना महाजन म्हणाले,हा एक अरुंद पदपथासारखा पूल होता, ज्याचा वापर जवळच्या शेतकऱ्यांनी एका गावातून दुसऱ्या गावात जाण्यासाठी केला होता. या पुलाची जास्त वजन सहन करण्याची क्षमता नव्हती. परंतु रविवारी या पुलावर एका ठिकाणी मोठ्या संख्येने पर्यटक जमले.
इतक्या गर्दीचा भार सहन न झाल्याने पूल वाकला आणि पाण्यात बुडाला. गेल्या काही दिवसांपासून या परिसरात सतत पाऊस पडत आहे, ज्यामुळे नदीत जोरदार प्रवाह होता. प्रशासनाने येथे पर्यटकांच्या प्रवेशावर आधीच बंदी घातली होती. पुलाच्या दोन्ही टोकांवर इशारा फलकही लावण्यात आले होते आणि पोलिसांनी वर्तमानपत्रात स्पष्ट इशाराही प्रकाशित केला होता. स्थानिक लोकांनीही पर्यटकांना येथे येऊ नये असे आवाहन केले होते.
तरीही, मोठ्या संख्येने पर्यटकांनी इशाऱ्यांकडे दुर्लक्ष केले आणि तिथे पोहोचले. पुलाच्या क्षमतेपेक्षा खूपच जास्त सुमारे 200 ते 250 लोक एकाच ठिकाणी उभे होते, ज्यामुळे ही भयानक दुर्घटना घडली.
तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्याच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, ही घटना कुंडमाळा परिसरात घडली, जिथे गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे, त्यामुळे नदीचा प्रवाह वेगवान होता. पण जेव्हा पूल कोसळला तेव्हा पाऊस पडत नव्हता. रविवार असल्याने घटनास्थळी मोठी गर्दी होती. प्रशासनाच्या इशाऱ्यानंतरही, या भागात पिकनिकसाठी येणाऱ्यांची मोठी गर्दी केली होती.
Edited By - Priya Dixit