रक्षाबंधनामागील शास्त्र काय ?
यमलहरींमुळे व पृथ्वीकणांमुळे संयोगाने पृथ्वीवर निर्माण होणार्या आच्छादनाचा, म्हणजे रक्षेचा आसुरी शक्तींना उपयोग होऊ नये, म्हणून त्यांचे स्त्री-शक्तीने पुरुषतत्त्वाच्या माध्यमातून केलेले बंधन म्हणजे रक्षाबंधन.
या दिवशी ब्रह्मांडात कार्यरत असणार्या यमलहरींच्या गतिमानतेतून निर्माण होणार्या घर्षणात्मक ऊर्जेतून वायुमंडलात प्रक्षेपित होणार्या तेजकणांना पृथ्वीकणांच्या संयोगाने ज्या वेळी जडत्त्व प्राप्त होते, त्या वेळी हे कण भूमीवर आपले आच्छादन तयार करतात. यालाच `रक्षा' असे संबोधले जाते.
