1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 8 एप्रिल 2023 (12:42 IST)

बारावी बोर्ड परीक्षा वर्षातून दोनदा!

exam
शिक्षण क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी केंद्र सरकारकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत अशा परिस्थितीत देशातील शालेय शिक्षणातील अभ्यासक्रमात बदल होत आहेत यासोबतच नवीन परीक्षा पद्धतीच्या ही वेगळ्या पद्धतीने अवलंब करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे सरकारने नवीन राष्ट्रीय अभ्यासक्रम नॅशनल कॅरिक्यूम फ्रेमवर्क फॉर फाउंडेशन स्टेज तयार करण्यासाठी स्थापन केलेले पॅनल लवकरच बारावी बोर्ड परीक्षा वर्षातून दोनदा आयोजित करण्याची शिफारस करू शकते
 
 नवीन फ्रेमवर्क अंतर्गत, इयत्ता 12 ची बोर्ड परीक्षा वर्षातून दोनदा सेमिस्टर आधारावर घेतली जाईल. त्याच वेळी, विद्यार्थ्यांना कला, व्यवसाय आणि विज्ञान विषयांमध्ये शिकवल्या जाणार्‍या परीक्षा देण्यापुरते मर्यादित राहणार नाही. 12वी बोर्डाच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना 16 वेगवेगळे अभ्यासक्रम दिले जातील आणि विद्यार्थी त्यांचे पर्याय निवडतील आणि बोर्डाची परीक्षा देतील. याबाबत तज्ज्ञांनी पाठ्यपुस्तकांची तसेच रचनाही स्पष्ट केली
 
  11वी आणि 12वी इयत्तेचे कार्यक्रम बदलणार आहेत. यासंदर्भात राज्य मंडळाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, 12वीची परीक्षा वर्षातून दोनदा होत असेल तर शिक्षण संस्थेने तसा अभ्यासक्रम तयार करावा. त्यानंतर संबंधित अभ्यासक्रमाला राज्य सरकारची मान्यता मिळणे आवश्यक आहे. त्यानंतर राज्य सरकार परीक्षा कशा पद्धतीने घ्यायचे याबाबत धोरण ठरवेल आणि त्यानुसार राज्य मंडळाला निर्देश देईल. नवीन शिक्षण धोरणात असे नमूद करण्यात आले आहे की 12वीच्या परीक्षा, एक MCQ आधारित असेल आणि दुसरी वर्णनात्मक असेल. दरम्यान, राज्य सरकारने नवीन शैक्षणिक धोरणातील सर्व घटकांची अंमलबजावणी करणे आवश्यक नाही. त्यामुळे बारावीच्या दोन परीक्षा घेण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय राज्य सरकार घेणार आहे.