संबंधित माहिती
- शेतकर्यांना दिलासा, शेतपिकांच्या झालेल्या नुकसानीसाठी १२२ कोटी रुपयांचा निधी मंजूर
- मंत्री राजेश टोपे आणि अमित देशमुख यांच्याकडून डिजिटल मीडियाचे प्रश्न मार्गी लावण्याची ग्वाही
- डॉ.बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व अनुसंधान केंद्रात ६१५ खाटांचे रुग्णालय व नवीन पदव्युतर अभ्यासक्रम
- युपीमध्ये जे घडलं ते खरं की खोटं, हे सुद्धा माहीत नाही, मग हा बंद कशासाठी?
- पुन्हा एकदा भाजपावरच जनतेनं विश्वास दाखवला : फडणवीस
बेळगावात भिंत कोसळून 7 जणांचा मृत्यू
रात्री झालेल्या मुसळधार पावसात मोठी दुर्घटना घडली आहे ज्यात घराची भिंत कोसळ्याने सात जणांचा मृत्यू झाला आहे. बेळगावच्या बादल अंकलगी गावात बुधवारी रात्री साधारणत: 9 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, अग्निशमन दलाचे जवान आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या दुर्घटनेत घटनास्थळीच पाच जणांचा मृत्यू झाला तर दोघांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतकांमध्ये दोन आठ वर्षांच्या मुलींचाही समावेश आहे.
मृत्यू झालेले सर्वच्या सर्व सातही जण हे एकाच कुटुंबातील असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
पुढील लेख
