दोन वर्षांपासून नक्षलवादी कारवाया थंडावल्या असा दावा पोलिसांकडून केला जात असताना गडचिरोलीत गेल्या काही दिवसांपासून नक्षलवादी संघटना सक्रीय झाल्या आहेत. गेल्या १५ दिवसांमध्ये सात जणांची नक्षलवाद्यांनी हत्या केली होती. खबरी ठरवून ग्रामस्थांची हत्या करण्याचे प्रकार सुरु असतानाच दुसरीकडे सुरक्षा दलांनाही नक्षलवाद्यांनी लक्ष्य केल्याचे प्रकार समोर आले होते. भूसुरुंग स्फोटाच्या घटनेसोबतच चकमकीचे प्रकारही वाढत होते. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्न उपस्थित झाले होते. या पार्श्वभूमीवर बुधवारी पोलिसांना मोठे यश मिळाले.