संबंधित माहिती
- पतीनेच खाऊ घातल्या गर्भपाताच्या गोळ्या, पत्नीचा मृत्यू
- पॅराशूटचा बेल्ट तुटून 400 फुटांवरून पडून साताऱ्यातील तरुणाचा मृत्यू
- सोलापूर जिल्हा साखरपट्टा रिटेवाडी पाणी उपसा सिंचन योजनेबाबत तात्काळ बैठक घेऊन ही योजना मार्गी लावण्यात येईल- एकनाथ शिंदे
- राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांच्यावर हल्लाबोल केला
- देश आणि धर्मासाठी खून करणे वाईट नाही-कालीचरण महाराज
म्हणून अजित पवारांनी केली अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी
विधानसभेत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड कृषी प्रदर्शनासाठी बेकायदेशीर निधी गोळा केल्याचा तसंच गायरान जमीन एका व्यक्तीला विकल्याचा आरोप अजित पवारांनी केला आहे.
“नागपूर खंडपीठाने कृषीमंत्र्यांविरोधात कडक शब्दात ताशेरे ओढले आहेत. महसूल राज्यमंत्री असताना त्यांनी वाशीम जिल्ह्यातील १५० कोटींची ३७ एकर गायरान जमीन खासगी व्यक्तीला दिली. त्यांनी कायदेशीर बाबींचं उल्लंघन केलं आहे. अब्दुल सत्तार यांच्याविरोधात ठोस पुरावे आहेत. त्यांनी पदाचा दुरुपयोग केला आहे. राज्य सरकार, सुप्रीम कोर्टाचा निर्णय़ माहिती असतानाही एका व्यक्तीला फायदा मिळवून देण्यात आला. त्यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे. त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी,” अशी मागणी अजित पवारांनी केली.
Edited By- Ratnadeep Ranshoor
