Marathi Biodata Maker

दोन ठार, औरंगाबादेत नेट बंद, अफवा पासरवाल तर तुमची खैर नाही

शनिवार, 12 मे 2018 (15:10 IST)

किरकोळ करणातून झालेल्या दंगलीचे औरगाबाद येथे मोठे पडसाद उमटले आहे. दोन गटाच्या भांडणातून उसळलेला हिंसाचार नियंत्रणात आला आहे. या हिंसाचारात  40 जण जखमी झाले असून, दोघांचा मृत्यू झाला आहे. काल  रात्री साडे अकरा वाजता उसळलेल्या हिंसाचारावर पोलिसांनी  नियंत्रण मिळवल आहे. मात्र हिंसाचार ग्रस्त भागात शंभर ते दीडशे गाड्या आणि चारशे ते साडे चारशे दुकानांना आगी लावण्यात आल्या आहेत. त्यामुळे वातावरण अजूनही तापले आहे.  दोन गटात झालेल्या दगडफेकीत 35 ते 40 जण जखमी झाले आहेत. सुरक्षेचा उपाय म्हणून काही भागात संचारबंदी आहे. आणि पूर्ण औरंगाबादमधलं इंटरनेट बंद करण्यात आले आहे. मात्र जर का अफवा पसरवली तर मग पोलिस कठोर कारवाई  करतील असा इशारा दिला आहे.  आय घटनेत जखमींमध्ये एका एसीपीचा समावेश आहे. हिंसाचार ग्रस्त भागात एसआरपीएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. नागरिकांनी कोणत्या अफवांवर विश्वास ठेवू नये आणि पोलिसांना सहकार्य करा, असं नम्र आवाहन वेब दुनिया करत आहे. कारण आता हिंसाचार थांबला असून, पोलिस कारवाई करत आहे.मोतीकारंजा परिसरातील अनधिकृत नळ कनेक्शन तोडण्यावरून झालेल्या वादातून दोन गट शुक्रवारी रात्री राडा झाला होता. काही लोकांच्या चुकीमुळे पूर्ण शहर वेठीस धरले गेले आहे. 

सर्व पहा

शनिदेवाच्या पूजेत तांब्याची भांडी का वापरू नयेत? नेमकं कारण काय?

जूनमध्ये गुरूचा महापरिवर्तन योग; ३ राशींचे भाग्य उजळणार

हॉटेलमधून मागवण्याऐवजी घरीच बनवा Restaurant Style Mix Veg

रक्तदाब नियंत्रणासाठी वेलची ठरते रामबाण? जाणून घ्या तिचे आश्चर्यकारक फायदे

Career in Polytechnic After 12th: बारावीनंतर या टॉप पॉलिटेक्निक कोर्समध्ये डिप्लोमा कोर्स करा

सर्व पहा

Bank closed : जूनच्या महिन्यांत एकूण १३ दिवस बँक बंद राहतील, सुट्ट्यांची यादी तपासा

1June 2026 New Rule: पीएफ पासून यूपीआय-एटीएम पर्यंत, १ जूनपासून कोणते नियम बदलणार, जाणून घ्या

ट्रम्प विरुद्ध इराण: कराराची आशा की नव्या संघर्षाचा धोका? ट्रम्प यांनी एक मोठा संकेत दिला

पुणे विषारी दारू प्रकरणात २२ जणांच्या मृत्यूने सुप्रिया सुळे यांचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल

LIVE: पुणे-पिंपरी विषारी दारू कांडानंतर सरकार ॲक्शन मोडमध्ये!

पुढील लेख
Show comments