शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated :औरंगाबाद , शुक्रवार, 30 सप्टेंबर 2022 (22:08 IST)

वाहनाने मेंढ्यांच्या कळपाला चिरडलं

औरंगाबादच्या धुळे-सोलापूर महामार्गावर मोठा अपघात झाला आहे. भरधाव वेगात आलेल्या वाहनाने संपूर्ण मेंढ्या चिरडल्या. सुमारे 50 ते 60 मेंढ्या चिरडून वाहन पुढे सरकले. मेंढ्या घेऊन जाणारे मेंढपाळ वाहनांना थांबण्याचे संकेत देत होते. मात्र, वाहनाने त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आणि वाहन बिचाऱ्या जनावराला चिरडत पुढे गेले. एवढा मौल्यवान प्राणी डोळ्यासमोर ठेचला गेल्याने एका मेंढपाळाचा जीव उद्ध्वस्त झाला. दुपारी दोनच्या सुमारास हा अपघात झाला. तर लेकराप्रमाणे जपलेल्या प्राण्यांना रस्त्यावर चेंदामेंदा अवस्थेत पाहून त्यांच्या डोळ्यात अश्रू आले.  
 
10 ते 15 मेंढ्यांचा अक्षरशः रक्ताचा चिखल झाला
औरंगाबादच्या धुळे-सोलापूर महामार्गावर हा अपघात झाला. घटनेचे वर्णन करताना मेंढपाळ म्हणाला, “मेंढ्या रस्त्यावरून येत असताना एक इंडिका भरधाव वेगाने येत होती. आम्ही सर्वांनी तिला खूप हातवारे केले. पण ती थांबली नाही. नंतर इंडिका वाल्याने बोट दाखवून इशारा केला की चुकी झाली, आमचा एक माणूस देखील या इंडिका खाली तुडवला जाणार होता जो मेंढ्या हाकत होता. या अपघातात १० ते १५ मेंढ्यांचा जागेवर मृत्यू झाला, त्यामुळे मेंढपाळाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.