संबंधित माहिती
- इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक कधी पूर्ण होणार? अशी राहणार त्याची वैशिष्ट्ये
- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या निधनापूर्वी शेवटच्या 24 तासांत काय काय घडलं?
- गुलाबराव पाटील म्हणाले, “मंत्रिपद गेले खड्ड्यात, शिवरायांचा अवमान केल्यास सोडणार नाही”
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादायी विचार
- आंबेडकरांचे अस्पृश्यतेविरुद्ध संघर्ष
प्रत्येक क्षेत्रात बाबासाहेबांच्या घटनेचा अपमान होताना दिसत आहे -संजय राऊत
न्यायव्यवस्था. प्रशासकीय व्यवस्था, राजकारण प्रत्येक ठिकाणी बाबासाहेबांच्या घटनेचा अपमान होताना दिसत आहे. म्हणून आज आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रकर्षाने आठवण होत आहे असं विधान संजय राऊत यांनी केलं आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि संजय राऊत महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर पोहोचले होते. यावेळी संजय राऊतांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
“बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज हे दोघे या महाराष्ट्राची दैवतं आहेत. ते आमच्या मनात आहेत. आज बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी जो महासागर उसळला आहे, त्यातील आम्ही एक आहोत,” असं संजय राऊत म्हणाले.
पुढे त्यांनी सांगितलं की “आम्हाला फक्त आजच त्यांचं स्मरण होत आहे असं नाही. जेव्हा जेव्हा या देशात कायदा आणि घटनेची पायमल्ली होते, सामान्यांवर अत्याचार होतात तेव्हा तेव्हा आम्हाला बाबासाहेबांची घटना आणि कार्य सतत आठवत असतं. आज आम्हाला आंबेडकरांची प्रकर्षाने आठवण होत आहे. कारण देशातील प्रत्येक क्षेत्रात घटनेची पायमल्ली सुरु आहे. न्यायव्यवस्था. प्रशासकीय व्यवस्था, राजकारण या प्रत्येक क्षेत्रात बाबासाहेबांच्या घटनेचा अपमान होताना दिसत आहे. म्हणून आज आम्हाला आंबेडकर आठवत आहेत”.
Edited by : Ratnadeep Ranshoor
Edited by : Ratnadeep Ranshoor
