शुक्रवार, 5 जुलै 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 9 ऑगस्ट 2023 (08:24 IST)

छत्रपती संभाजीनगर : २५ किलो टोमॅटो चोरीला गेल्याने सीसीटीव्ही सुरक्षा

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने त्याच्या शेतातील टोमॅटो पिकावर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. गेल्या १० दिवसांत शेतातून २० ते २५ किलो टोमॅटो चोरीला गेल्याने कॅमेरे लावावे लागल्याचे शेतकऱ्याने सांगितले.
 
अशा परिस्थितीत टोमॅटोच्या चोरीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचे शेतकरी शरद रावते यांनी सांगितले. टोमॅटोचा भाव पूर्वी २२ ते २५ रुपये किलो होता, मात्र आता तो १०० ते २०० रुपये किलोने विकला जात आहे.
 
शेतकऱ्याने सांगितले की, त्यांचे शेत ५ एकरात पसरले आहे, ज्यामध्ये १.५ एकरमध्ये टोमॅटोची लागवड केली जात आहे. आता यातून ते ६ ते ७ लाख रुपये कमवू शकतात. लवकरच शेतात दुसरे पीक येणार आहे. कॅमेरे बसवण्यासाठी २२ हजार रुपये खर्च झाले आहेत. हे कॅमेरे सौरऊर्जेवर चालतात, त्यामुळे मला वीज पुरवठ्याची चिंता नाही. मी माझ्या फोनवरून शेतीचे निरीक्षण करू शकतो.

Edited By - Ratnadeep Ranshoor