1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. Chief Minister Fadnavis directs administration to be alert

महाराष्ट्रातील अतिवृष्टीबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतली आढावा बैठक, प्रशासनाला सतर्क राहण्याचे निर्देश

महाराष्ट्रातील अतिवृष्टीबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतली आढावा बैठक
महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सोलापूर, रायगड, मुंबई आणि एमएमआर भागात मुसळधार पाऊस पडला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रशासनाला सतर्क राहण्याचे निर्देश दिले.
 
मिळालेल्या माहितनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यात मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा सतत आढावा घेत आहे. या परिस्थितीत, त्यांनी नागरिकांना तात्काळ मदत पुरवण्यासाठी संपूर्ण प्रशासनाला सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहे. ज्या ठिकाणी नुकसान झाले आहे त्या ठिकाणी तातडीने पंचनामा तयार करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहे. मुख्यमंत्री राज्याचे मुख्य सचिव आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी सतत संपर्कात आहे.
तसेच राज्यातील पावसाच्या परिस्थितीची माहिती विविध यंत्रणांकडून मुख्यमंत्र्यांना देण्यात आली. राज्यातील पुणे, सातारा, सोलापूर, रायगड, मुंबई आणि एमएमआर भागात मुसळधार पाऊस पडला आहे.  
तसेच रायगडमध्ये वीज पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे, तर महाड ते रायगड किल्ल्याकडे जाणारा रस्ता मुसळधार पावसामुळे बंद करण्यात आला आहे.
 
पुढील लेख
माजलगावचे भाजपचे माजी आमदार आर.टी. देशमुख यांचा रस्ते अपघातात मृत्यू