महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे आजपासून दहावीची बोर्ड परीक्षा सुरू झाली आहे. परीक्षेदरम्यान कोणत्याही प्रकारची फसवणूक किंवा प्रश्नपत्रिका गळती होऊ नये म्हणून परीक्षा केंद्रांवर अनेक खबरदारी घेण्यात आली आहे. दरम्यान, जालना जिल्ह्यातील बदनापूरमध्ये दहावीच्या बोर्डाच्या पेपरफुटीची बातमी समोर आली आहे. परीक्षा सुरू झाल्यानंतर लगेचच मराठीचा पेपर फुटल्याचे...