राज्यात विरोधक सरकारच्या विरोधात हल्लाबोल आंदोलन करत आहेत. मात्र, सत्तेत असताना त्यांच्या तिजोरीवरील डल्लामारचे पुरावे सभागृहासमोर सादर करणार असल्याचा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. विरोधकांनी काढलेली यात्रा ही हल्लाबोल नव्हे, तर डल्लामार यात्रा होती, अशी टीकाही फडणवीस यांनी केली.