गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 18 मे 2021 (19:22 IST)

तौक्ते चक्रीवादळ: नौदलाने 3 जहाजांच्या मदतीने विशेष ऑपरेशन करून अडकलेल्या 146 लोकांचे प्राण वाचविले

अरबी समुद्रात चक्रीवादळ तौक्ते ' मुळे समुद्रात अनियंत्रित होऊन वाहत असलेल्या एका नावेत असलेल्या 146 जणांना भारतीय नौदलाने वाचवले असून बाकीच्यांचा शोध अद्याप सुरू आहे.
एका अधिकाऱ्याने सांगितले की, मंगळवारी सकाळी नौदलाने पी -88 बचाव कार्यांसाठी तैनात केले. शोध आणि बचाव कार्यासाठी हे नौदलाचे बहु-मिशन सागरी गस्त विमान आहे.
यापूर्वी, सोमवारी, बॉम्बे हाय ऑईल फील्डमध्ये उत्खननासाठी तयार करण्यात आलेल्या दोन बार्ज अँकर मधून वाहून गेल्याची  माहिती मिळाल्यावर नौदलाने तीन फ्रंटलाइन वॉरशिप जहाज तैनात केले होते. या 2 बॅरेजेसवर 410 लोक होते. या 2 बेरेज च्या मदतीसाठी आयएनएस कोलकाता, आयएनएस कोची आणि आयएनएस तलवार यांना तैनात केले होते.
मंगळवारी सकाळी नौदलाच्या प्रवक्त्याने सांगितले की अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीत एकूण 146 लोकांना समुद्रातील वांझरे  पी 305 मधून वाचविण्यात आले. ते म्हणाले की, इतरांना वाचविण्यासाठी शोध आणि बचाव (एसएआर) अभियान रात्रभर सुरू होते.