संबंधित माहिती
- अबू आझमींच्या भाषणाची चौकशी करा, भातखळकर यांंच अमित शहा यांना पत्र
- या 3 स्टेप्सचा वापर करून आपण उबदार कपड्यांना स्टोअर करू शकता.
- शिवेंद्रराजेच नाही तर राष्ट्रवादी सोडलेले इतर नेतेही पक्षात परत येणार : नवाब मलिक
- मला भाजपाकडून पक्षात प्रवेश करण्यासाठी ऑफर देण्यात आली होती : शशिकांत शिंदे
- अर्थसंकल्पीय अधिवेशन: 30 जानेवारी रोजी पीएम नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक
काँग्रेस सारख्या पक्षालाही पायउतार व्हावे लागले-जयंत पाटील
राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेदरम्यान प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील यांनी चिमूर विधानसभा मतदारसंघात पदाधिकारी, कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेतली. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय पवार साहेब यांच्यावर असलेल्या आस्थेमुळे ठिकठिकाणी कार्यकर्ते आवर्जून मोठ्या संख्येने बैठकीला गर्दी करत आहेत. कार्यकर्त्यांना संबोधित करताना ना. जयंत पाटील म्हणाले की, "पराभव येत असतो, अपयश येत असतं. एकेकाळी देशात काँग्रेसचा काळ कधी ढळणारच नाही, अशी परिस्थिती होती. मात्र काँग्रेस सारख्या पक्षालाही पायउतार व्हावे लागले. देशात सत्तांतर पाहायला मिळालं. हे सर्व इच्छाशक्तीच्या जोरावरच झालं. त्यामुळं कार्यकर्त्यांनी इच्छाशक्ती ठेवून बुथ बांधणी करावी. राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढवावी."
यावेळी माजी मंत्री रमेश बंग, विदर्भ दौरा समन्वयक प्रवीण कुंटे पाटील, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, नागपूर जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख, माजी आमदार प्रकाश गजभिये, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे आणि पक्षाचे इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
