1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 1 मे 2021 (15:55 IST)

मुख्यमंत्र्यानी केलेल्या घोषणांची किती अंमलबजावणी झाली : आमदार विखे

How many announcements made by the Chief Minister were implemented: MLA Vikhe
राज्य सरकारने दुसऱ्या लॉकडाऊनची घोषणा केली. मात्र, पहिल्या लॉकडाऊनच्या वेळेस मुख्यमंत्र्यानी केलेल्या घोषणांची किती अंमलबजावणी मंत्री आणि विभागाकडून झाली? असा सवाल भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे यांनी केला. आमदार विखे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना राज्यात दुसऱ्या लॉकडाऊनवर आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना मुख्यमंत्र्यांच्या मागील घोषणेनंतरही गरजूंना धान्य मिळालेले नाही.सामान्य माणसाची उपासमार सुरूच आहे. किमान झालेल्या घोषणांची अंमलबजावणी करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. 
 
केंद्र सरकारचा लसीकरणात दुजाभाव हा महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांचा आरोप आश्चर्यकारक वाटतो. एकीकडे राज्यात सर्वाधिक लसीककरण झाले म्हणून सरकार पाठ थोपटून घेते.मग केंद्राच्या सहकार्याशिवाय हे लसीकरण झाले काॽ काय बोलतोय याचे भान मंत्र्यांनी ठेवायला हवे. एक मेपासून लसीकरणासाठी सर्वच राज्यांनी पुढाकार घेतला असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र म्हणजे स्वतःची अब्रू झाकण्याचा प्रकार आहे. एक वर्षापासून कोविड संकट आहे.
 
सुविधांचा अभाव असल्याचे आज कळाले काॽ फक्त फार्स करायचा आणि स्वतःचे अपयश झाकण्यासाठीचा हा पत्रव्यवहार आहे.