Festival Posters

रक्तपेढी सुरु ठेवा २४ तास नाहीतर होणार कारवाई

बुधवार, 27 फेब्रुवारी 2019 (08:22 IST)
राज्य रक्त संक्रमण परिषदे मोठा निर्णय घेतला आहे. रक्ताची गरज रुग्णांना दिवस-रात्र कधीही कोणालाही लागू शकते. या कारणामुळे रुग्णांना ज्यावेळी रक्त आवश्यक असेल त्याचवेळी जर रक्तपेढी बंद आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याच्या सूचना ‘राज्य रक्त संक्रमण परिषदेने’दिल्यात. मुंबई उपनगरातील एका रुग्णालयातील पालिकेची रक्तपेढी रात्री बंद असल्याची तक्रार ‘राज्य रक्त संक्रमण परिषदे’ला रुग्णांच्या नातेवाइकांनी दिली होती, त्याच तक्रराची दखल घेत परिषदेकडून ही सूचना दिली गेली आहे. वांद्रे येथील ‘के.बी. भाभा’रुग्णालयातील रक्तपेढी बंद आहे याबबत तक्रार चेतन कोठारी यांनी ‘राज्य रक्त संक्रमण परिषदे’कडे केली, रक्तपेढी रात्री बंद असल्याने इतर खासगी रक्तपेढ्यांचे काम मात्र जोमात सुरु होते, असे समोर आले. ही गंभीर तक्रार परिषदेला मिळाली त्यामुळे परिषदेकडून मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना संपर्क केला गेला, त्यावर परिषदेने पालिकेकडून खुलासा मागवला आहे. सोबतच  ही रक्तपेढी परत रात्रीची बंद आढळली तर कारवाई करावी, असे आदेशही देण्यात आले आहेत. त्यामुळे तुमची ही तक्रार असेल तर ती नक्की नोंदवा त्यामुळे कोणाचा तरी जोव नक्की वाचेल.

सर्व पहा

मान्सूनमध्ये कार चालवताना 'या' ८ चुका टाळा; नाहीतर होऊ शकते मोठे नुकसान

Birthday Wishes For Sister in Marathi बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

कशेडी घाटात खरंच भूत आहे का ? जाणून घ्या 'त्या' रहस्यमय कथांमागील सत्य!

संत नामदेव महाराज समाधी: इतिहास, महत्त्व आणि नामदेव पायरीची संपूर्ण माहिती

July Monthly Horoscope 2026 मासिक राशिभविष्य: जुलै २०२६ मध्ये 'या' राशींवर होणार धनाचा वर्षाव; तुमचे भाग्य कसे असेल?

सर्व पहा

वाशिम न्यायालयाने नऊ पोलिसांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली; कोठडीतील मृत्यू प्रकरण

शेतकऱ्यांसाठी माती आणि मुरुम रॉयल्टीमुक्त; शेतकऱ्यांना मोठा दिलासा

महाराष्ट्र विधानसभेने महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक २०२६ मंजूर करून इतिहास रचला

तुळजापूरमधील तुळजा भवानीची ४,१२१ एकर जमीन सरकारी नोंदींमधून गायब

मुंबई, ठाणे आणि कोकणसाठी रेड अलर्ट जारी; पुण्यातील घाट परिसरात मुसळधार पावसाचा इशारा

पुढील लेख
Show comments