संबंधित माहिती
- कोरोनाच्या काळात अमेरिकेसह अनेक देश भारताच्या मदतीसाठी सरसावले
- राज्यात लॉकडाऊन वाढणार का ? वाचा, जयंत पाटील काय म्हणाले
- मद्रास उच्च न्यायालयाचा आदेश - 1 आणि 2 मे रोजी देशातील या दोन राज्यात लॉकडाउन
- राज्यात गेल्या सहा दिवसात ४ लाख ४२ हजार रुग्ण झाले कोरोनामुक्त – आरोग्यमंत्री
- राज्यात विक्रमी 5 लाखाहून अधिक लोकांचं लसीकरण
राज्यात लॉकडाउन वाढवला पाहिजे : भुजबळ
राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी राज्यात लॉकडाउन वाढवला पाहिजे अशी मागणी केली आहे. “लॉकडाउन वाढला पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. नाशिक जिल्ह्यात १९ एप्रिलला ६८०० असणारी रुग्णसंख्या गेल्या दोन दिवसात ३६०० एवढ्यावर आली आहे. रुग्णसंख्येत होणारी वाढ थांबली असून कमी होण्यास सुरुवात झाली आहे. हे एकट्या नाशिक जिल्ह्याचं आहे. १५ आमदार तिथून निवडून येत असून तिथे ही परिस्थिती आहे”.
“लॉकडाउन कोणालाही आवडत नसून माझाही आधीपासून विरोध आहे. पण आरोग्य सुविधा संपत आहेत. असाचा मारा सुरु राहिला तर खूप मोठा गोंधळ होईल. लॉकडाउन करुन साखळी खंडित करणे आणि रुग्ण वाढणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे,” असं भुजबळांनी सांगितलं.
