विदर्भात वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट
महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये तीव्र उष्णता आणि उष्णतेच्या लाटेचा सामना करणाऱ्या नागरिकांना हवामान विभागाने काहीसा दिलासा दिला आहे. आजपासून राज्याच्या हवामानात मोठा बदल होणार आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ मध्ये जिल्ह्यांमध्ये हवामान बदलणार आहे. या भागांमध्ये ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.
विदर्भ: नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशिमसह जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.
आजपासून सुरू होणाऱ्या पावसामुळे उकाड्यापासून दिलासा मिळणार असला तरी, हवामान तज्ज्ञ आणि अंदाजानुसार, हा खरा मान्सून नाही. पूर्वी दिलेल्या माहितीनुसार, मान्सून अद्याप केरळमध्ये पोहोचलेला नाही, त्यामुळे तो महाराष्ट्रात १० जूनच्या आसपास किंवा त्यानंतरच दाखल होण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, खानदेश आणि कोकण भागातील काही ठिकाणी दुपारच्या वेळी ढगाळ आकाश आणि मेघगर्जनेसह पाऊस पडेल.
Edited By- Dhanashri Naik
विदर्भ: नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशिमसह जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.
आजपासून सुरू होणाऱ्या पावसामुळे उकाड्यापासून दिलासा मिळणार असला तरी, हवामान तज्ज्ञ आणि अंदाजानुसार, हा खरा मान्सून नाही. पूर्वी दिलेल्या माहितीनुसार, मान्सून अद्याप केरळमध्ये पोहोचलेला नाही, त्यामुळे तो महाराष्ट्रात १० जूनच्या आसपास किंवा त्यानंतरच दाखल होण्याची शक्यता आहे.
Edited By- Dhanashri Naik
