नागपूर येथे आई आणि लेकीने गळफास घेऊन आत्महत्या केली; पोलिसांनी सुसाईड नोट जप्त केली
महाराष्ट्रातील नागपूर येथे एका आई आणि मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी घटनास्थळावरून एक सुसाईड नोट जप्त केली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे. या घटनेची सर्व बाजूंनी चौकशी केली जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. नागपूरच्या नंदनवन परिसरात आई आणि मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पोलीस घटनास्थळी पोहोचले असता त्यांना एक सुसाईड नोट सापडली. मृत महिलेच्या पतीचाही मृत्यू झाला होता. संगीता पतीच्या निधनानंतर जिल्हा परिषदेत शिक्षिकेची नोकरी करत होत्या. तर मुलगी आकांक्षा इंजिनिअर होती इंजिनिअर होती.
नागपूरमध्ये १ मे शुक्रवारी ही हृदयद्रावक घटना घडली. आई संगीता ढबाले आणि मुलगी आकांक्षा ब्रह्मे या दोघींनी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. प्राथमिक माहितीनुसार आकांक्षाच्या बाळाचा जन्मतः लगेच मृत्यू झाल्यानंतर सासरकडून मानसिक छळ आणि त्रास वाढला होता. तसेच माहिती समोर आली आहे की आकांक्षाचा पती लोकेश ब्रम्हे संपत्तीवरून सतत वाद घालत होता. यामुळे नैराश्य आले आणि दोघींनी टोकाचे पाऊल उचलले.
घटनास्थळी सुसाईड नोट्स सापडल्या असून ज्यात सासरकडील लोकांना मृतदेह देऊ नये असे लिहिले असल्याचे काही रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे. पोलिस तपास करत आहे आणि सासरच्या लोकांवर छळाचा आरोप असल्याने चौकशी सुरू आहे. ही घटना नागपूरसह संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवून गेली आहे.
Edited By- Dhanashri Naik
मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. नागपूरच्या नंदनवन परिसरात आई आणि मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पोलीस घटनास्थळी पोहोचले असता त्यांना एक सुसाईड नोट सापडली. मृत महिलेच्या पतीचाही मृत्यू झाला होता. संगीता पतीच्या निधनानंतर जिल्हा परिषदेत शिक्षिकेची नोकरी करत होत्या. तर मुलगी आकांक्षा इंजिनिअर होती इंजिनिअर होती.
नागपूरमध्ये १ मे शुक्रवारी ही हृदयद्रावक घटना घडली. आई संगीता ढबाले आणि मुलगी आकांक्षा ब्रह्मे या दोघींनी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. प्राथमिक माहितीनुसार आकांक्षाच्या बाळाचा जन्मतः लगेच मृत्यू झाल्यानंतर सासरकडून मानसिक छळ आणि त्रास वाढला होता. तसेच माहिती समोर आली आहे की आकांक्षाचा पती लोकेश ब्रम्हे संपत्तीवरून सतत वाद घालत होता. यामुळे नैराश्य आले आणि दोघींनी टोकाचे पाऊल उचलले.
Edited By- Dhanashri Naik
