चंद्रपूरमधील 54 जीर्ण इमारतींना महापालिकेने बजावल्या नोटीस
चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात असलेल्या अनेक जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारती केवळ इमारतीं मधील रहिवाशांसाठीच नव्हे तर संपूर्ण परिसरातील लोकांसाठीही गंभीर सुरक्षेचा धोका बनल्या आहेत. पावसाळ्यातील हा धोका लक्षात घेता, महानगरपालिकेने या इमारती ओळखल्या असून 54 इमारतींना आणि त्यांच्या मालकांना कडक कारवाईसाठी नोटीस बजावल्या आहे. या इमारती धोकादायक स्थितीत असल्याचे म्हटले आहे.
या इमारतीतील रहिवाशांना त्यांचे महत्त्वाचे कागदपत्रे आणि वस्तूंसह तात्काळ सुरक्षित ठिकाणी जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यासोबतच, मालकांना त्यांच्या इमारतींची तात्काळ दुरुस्ती करण्याचे आणि दुरुस्तीनंतर नोंदणीकृत स्ट्रक्चरल इंजिनिअरकडून स्ट्रक्चरल स्थिरता प्रमाणपत्र मिळवून ते महापालिकेला सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत..
या कारणास्तव, वेळेवर दुरुस्ती आणि सुरक्षिततेच्या उपाययोजना न केल्यास कायदेशीर कारवाई तसेच सक्तीने निष्कासन केले जाईल, असा इशारा महापालिकेने दिला आहे. ही कृती केवळ इमारतींची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठीच नाही तर मानवी जीवनाचे रक्षण करण्यासाठी देखील आवश्यक आहे.
Edited By - Priya Dixit