मातोश्रीवर माझा आवाज दाबला गेला, दिपाली सय्यद यांचा एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर आरोप  
					
										
                                       
                  
                  				  "मी अनेकदा उद्धव ठाकरेंना भेटायला प्रयत्न केला. मात्र माझा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचू दिला नाही. मातोश्रीतील त्यांच्या जवळच्या काही लोकांनी माझा आवाज दाबला, असा आरोप अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी व्यक्त केली आहे.
				  													
						
																							
									  
	 
	दिपाली यांनी शनिवारी (22 ऑक्टोबर) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटावर टीका केली.
				  				  
	
	त्या म्हणाल्या, "काही वेळापूर्वी मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यांना भेटणं खूप सोपं होतं. मात्र उद्धव ठाकरे अद्यापही नॉटरिचेबल आहेत."
				  											 
						
	 
							
							 
							
 
							
						
						 
																	
									  
	 
	उद्धव ठाकरे यांच्या औरंगाबाद दौऱ्याविषयी प्रश्नाचं उत्तर देताना त्या म्हणाल्या, "उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र दौरा करावा, अशी विनंती मी यापूर्वीच केली होती. पण आता त्याला उशीर झाला आहे." ही बातमी न्यूज 18 लोकमतने दिली.
				  																								
											
									  
	
	Published By- Priya Dixit