Festival Posters

लवकरच पुन्हा एकदा नाईटलाईफ सुरु होणार : आदित्य ठाकरे

बुधवार, 3 फेब्रुवारी 2021 (07:37 IST)
कोरोनानंतर लवकरच पुन्हा एकदा नाईटलाईफ सुरु होणार अशी घोषणा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे  यांनी केली आहे. त्यामुळे ‘मिशन बिगीन अंतर्गत हळूहळू सर्व बाबी सुरु केल्या, त्यामुळे नाईटलाईफ देखील लवकरच सुरु करु, रेस्टॉरंटही रात्री एक वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी दिली, अशी माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. मुंबईत २६ जानेवारी २०२० रोजी नाईट लाईफची सुरुवात झाली. मात्र कोरोनामुळे ही नाईट लाईफ योजना कुठेतरी बारगळी. मात्र आता पुन्हा मुंबईत नाईट लाईफ सुरु करण्यासाठी आदित्य ठाकरे सरसावले आहेत.
 
याबाबत बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, “आता आपण रेस्टॉरंटला 1 पर्यंत सुरु करण्याची परवानगी दिली आहे. हळूहळू आम्ही सर्व बाबी सुरू केल्या आहेत, अजूनपर्यत तरी कोणतीही बाब बंद करण्याची वेळ आलेली नाही. त्यामुळे नाईट लाईफ देखील लवकरच सुरू करू” असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे. यावेळी त्यांनी रेस्टॉरंटना रात्री 1 वाजेपर्यंत सुरू करण्याला परवानगी देण्यात आल्याच्या निर्णयालाही अधोरेखित केलं.
 
मुंबईत २६ जानेवारी २०२० पासून मुंबईत नाईट लाईफला सुरुवात झाली. त्यानंतर मुंबईत बीकेसी, नरिमन पॉईंट, कालाघोडा या ठिकाणचे हॉटेल, पब, मॉल्स, थिएटर 24 तास खुले ठेवण्याची त्यात परवानगणी देण्यात आली होती. हे सर्व त्यावेळी प्रायोगिक तत्त्वावर सुरु करण्यात आले होते. 

सर्व पहा

संत श्री निवृत्तीनाथ महाराज पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

स्त्रियांनी नारळ का फोडू नये? धार्मिक आणि शास्त्रीय कारण ऐकून तुम्हीही थक्क व्हाल!

Mangal Nakshatra Parivartan 2026 मंगळ मृगशिरा नक्षत्रात प्रवेश करणार; २४ जुलैपासून या राशींचे नशीब उजळणार!

काळाकुट्ट तवा स्वच्छ करण्यासाठी महागड्या क्लीनरची गरज नाही; ह्या टिप्स पुरेशा आहे

WHO चा धोक्याचा इशारा! जगातील ९२% लोकसंख्येला कर्करोगाचा धोका; पुरुष आणि महिलांमधील 'या' कॅन्सरचे प्रमाण सर्वाधिक

सर्व पहा

LIVE: भंडारा येथे भीषण अपघातात ट्रॅक्टरखाली चिरडून शेतकऱ्याचा मृत्यू

पुण्यात संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांच्या भव्य स्वागतासाठी सहा लाख वारकरी दाखल

नागपूरमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि ब्लॅकमेल केल्या प्रकरणी आरोपीला अटक

महाराष्ट्र विधानसभेत भेसळ करणाऱ्यांना मृत्युदंडाच्या शिक्षेच्या मागणीवर मंत्री नरहरी झिरवाल यांचे स्पष्टीकरण

भंडारा येथे भीषण अपघातात ट्रॅक्टरखाली चिरडून शेतकऱ्याचा मृत्यू

पुढील लेख
Show comments