संबंधित माहिती
- अधीर यांच्या राष्ट्रपतींविरोधातील वक्तव्यावरून गदारोळ, स्मृती इराणी यांनी काँग्रेसला घेरले, आणखी तीन खासदार राज्यसभेतून निलंबित
- ओबीसी आरक्षणाविनाच 'त्या' निवडणुका घ्या; सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाला फटकारलं
- राज्यातील या ९ महापालिकांच्या निवडणुकीसाठी प्रारुप मतदार यादी १३ ऑगस्टला प्रसिद्ध होणार
- काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे शिंदे गटात जाणार,दिले त्यांनीच उत्तर
- निवडणुकीपूर्वीच शिवसेना आणि राष्ट्रवादीने एकत्र येण्याचे ठरले होते : फडणवीस
काँग्रेस इलेक्शन मोडवर, थोरांतांवर दिली मोठी जबाबदारी
निवडणुका आल्यावर ऐनवेळी धावपळ आणि जमवाजमव करण्याऐवजी काँग्रेसने यासाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभारण्याचे ठरविण्यात आले आहे. त्यासाठी राज्यस्तरीय निवडणूक व्यवस्था समिती स्थापन करण्यात आली आहे.
या समितीचे प्रमुख म्हणून माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची तर समन्वयक म्हणून पुण्याचे मोहन जोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यात नेहमीच विविध स्तरावर निवडणूक प्रक्रिया सुरू असतात.
त्यामुळे निवडणुकीशी निगडीत बाबींचे सातत्याने अवलोकन होत रहावे, त्यावर समिक्षा होत रहावी तसेच पूर्व तयारी योग्य वेळी व्हावी यासाठी निवडणूक व्यवस्था समिती कार्य करणार असल्याचे काँग्रेसतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
अशी आहे समिती : बाळासाहेब थोरात (समिती प्रमुख), मोहन जोशी (समन्वयक). तर समितीचे सदस्या पुढीलप्रमाणे अमित देशमुख, सुनिल केदार, अस्लम शेख, सुरेश वरपूडकर, संग्राम थोपटे, सुभाष धोटे, डॉ. उल्हास पाटील, विकास ठाकरे, विरेंद्र जगताप.
