उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये वाढणारी गर्दी लक्षात घेऊन, रेल्वेने मुंबई आणि पुणे ते नागपूर दरम्यान ८ उन्हाळी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल.
उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये वाढणारी गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे.
मुंबई, पुणे आणि नागपूर दरम्यान आठ उन्हाळी विशेष एक्सप्रेस गाड्या धावणार आहेत . यामुळे प्रवाशांना, विशेषतः सुट्ट्यांमध्ये प्रवास करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) आणि नागपूर दरम्यान दोन फेऱ्या चालवण्यात येतील. गाडी क्रमांक ०१०२१ स्पेशल ३ एप्रिल रोजी LTT वरून ००:५५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी १५:४५ वाजता नागपूरला पोहोचेल. गाडी क्रमांक ०१०२२ स्पेशल नागपूरहून २०:०० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ११:४५ वाजता LTT ला पोहोचेल. ही गाडी ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा यांसारख्या प्रमुख स्थानकांवर थांबेल.
पुणे ते नागपूर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक विशेष गाडीही चालवण्यात येणार आहे. गाडी क्रमांक ०१४६७ विशेष गाडी ३ एप्रिल रोजी दुपारी ३:५० वाजता पुण्याहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ६:३० वाजता नागपूरला पोहोचेल. तर, ०१४६८ विशेष गाडी ४ एप्रिल रोजी सकाळी ८:०० वाजता नागपूरहून सुटेल आणि रात्री ११:३० वाजता पुण्याला पोहोचेल. ही गाडी उरुळी, दौंड कॉर्ड लाईन, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा स्थानकांवर थांबेल.
आरक्षण २४ मार्चपासून सुरू होईल.
या उन्हाळी विशेष गाड्यांसाठी आरक्षण प्रक्रिया २४ मार्चपासून सुरू होईल. प्रवासी ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने तिकीट बुक करू शकतात.
रेल्वेच्या या निर्णयामुळे उन्हाळ्याच्या हंगामात गाड्यांमधील प्रचंड गर्दी व्यवस्थापित करण्यास मदत होईल. तसेच, यामुळे प्रवाशांना कन्फर्म तिकीट मिळण्याची शक्यता वाढेल, ज्यामुळे प्रवास अधिक आरामदायी आणि सोयीस्कर होईल.
Edited By - Priya Dixit