गुरूवार, 19 सप्टेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 21 ऑगस्ट 2024 (11:37 IST)

राज्यात पुढील 3 ते 4 दिवस मेघगर्जनेसह पाऊस कोसळणार,आज या ठिकाणी पावसाचा अलर्ट

सोमवार पासून पुन्हा पावसाने हजेरी लावली आहे. मराठवाडा, विदर्भ भागात पावसाने जोरदार आगमन केले आहे. पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना फायदा झाला असून शेतकऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. आज बुधवारी अनेक जिल्ह्यांत मेघसरी बरसणार अशी शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.  
 
 राज्यातील विविध भागात पुढील तीन ते चार दिवस विजांच्या कडकडाटांसह पाऊस येण्याची शक्यता भारतीय हवामान खात्यानं वर्तवली आहे.  

सध्या मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पत्ता बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. रायलसीमा आणि परिसरावर 900 मीटर उंचावर चक्राकार वाऱ्याची स्थिती बनली आहे. या कारणामुळे अनेक राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. 

आज सिंधुदुर्ग, जळगाव, रत्नागिरी, सांगली, पुणे, सातारा जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. तर ठाणे, मुंबई, पालघर, नंदुरबार, धुळे, नाशिक, रायगड, अहमदनगर, पुणे, आणि सोलापूर जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

आज जालना, बीड, छत्रपती संभाजी नगर, धाराशिव, परभणी पावसाचे पावसाचाआगमन होण्याची शक्यता आहे. तर विदर्भातील अकोला, अमरावती, वाशीम, बुलडाणा, यवतमाळ मध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. 
वर्धा, गोंदिया, नागपूर, भंडारा, गडचिरोली जिल्ह्यात पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. पुढील 3 ते 4 दिवस मुसळधार पाऊस कोसळणार आहे. 
Edited by - Priya Dixit