संबंधित माहिती
- पण ही फक्त सदिच्छा भेट, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांची माहिती
- मनसेप्रमुख राज ठाकरे आक्रमक, म्हणाले मग आमची परवानगी घ्यावी लागेल
- मंगळवारचा उपवास: या 8 कामाच्या गोष्टी जाणून घ्या
- Whatsappवर आता सहज एड करू शकता कॉन्टॅक्ट, येत आहे फीचर
- सेफ अली खान करीना कपूरसाठी बनला शेफ, ईदच्या निमित्ताने बनविलेले मटण बिर्याणी तर करिश्माने असे केले कौतुक
महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून गेला आहात, हे विसरु नका
श्रमिक ट्रेनच्या मुद्द्यावरुन रेल्वेमंत्री आणि राज्य सरकारमध्ये ट्विटर वॉर सुरु आहे. या शाब्दिक लढाईत आता शिवसेना नेते संजय राऊत यांनी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना पुन्हा टोला लगावला आहे. तुम्ही महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून गेला आहात, हे विसरु नका, असा खोचक सल्ला राऊत यांनी दिला. तसेच १४ मे रोजी रेल्वेकडून चालवण्यात आलेल्या नागपुर-उधमपूर ट्रेनच्या विलंबावरूनही राऊत यांनी रेल्वेमंत्र्यांना लक्ष्य केले.
नागपुर - ऊधमपुर ट्रेन साठी कुठली यादी घेतली होती. आधी ट्रेन नंतर माणसे जमा करण्यासाठी काय कष्ट घेतले, कृपया जाहीर कराल? मग आता यादी कसली मागताय?, असा सवाल राऊत यांनी गोयल यांना विचारला आहे.
१४ मे रोजी चालवण्यात आलेली नागपुर- उधमपूर ट्रेन तब्बल नऊ तास उशीरा आली होती. त्यामुळे या ट्रेनला उधमपूरमध्ये जाण्यासही विलंब लागला होता. या सगळ्यामुळे ट्रेन सुटण्याच्या वेळेत स्टेशनवर आलेल्या मजुरांची मोठी गैरसोय झाली होती.पियुषजी,@PiyushGoyal १४ मे २०ला सुटलेल्या नागपुर - ऊधमपुर ट्रेन साठी कोठली यादी घेतली होती. आधी ट्रेन नंतर माणसे जमा करण्यासाठी काय कष्ट घेतले, कृपया जाहीर कराल? आता म यादी कसली मागताय? राज्यसभेत आपण महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताय हे विसरू नका. @PawarSpeaks @CMOMaharashtra
— Sanjay Raut (@rautsanjay61) May 25, 2020
