संबंधित माहिती
- शरद पवार, राज ठाकरे यांचा विमानातून एकत्र प्रवास, राजकीय चर्चेला उधाण
- प्रश्न विचारले म्हणून चौकीदाराने सीबीआय अधिकारी हटवले - राहुल गांधी, जेटलींचे उत्तर
- निवडणूकांच्या वेळी भाजपाने जनतेची फक्त दिशाभुलच केली, दिलेली आश्वासने खोटी - उद्धव ठाकरे
- उस्मानाबाद व लोहारा पीक विम्या संदर्भात शेतकऱ्यांना पैसे मिळेपर्यंत पाठपुरावा करणार - आ.राणाजगजितसिंह
- वडिलांचं स्मारक बांधता आलं नाही, ते राम मंदिर काय बांधणार?
लोकशाही मार्गाने सत्ता हिसकावून घेऊ
केंद्र आणि राज्यात सत्तेवर असलेल्या भाजप सरकार सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचा एक निर्णय घेताना दिसत नाही. त्यामुळे आगामी काळात लोकशाही मार्गाने त्यांच्याकडून सत्ता हिसकावून घेऊ, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे.
सीबीआयला सध्या वेठीस धरण्याचा प्रयत्न होतो आहे. सीबीआयच्या अधिकार्याला रातोरात हकालपट्टी केली जाते आणि स्वतःच्या विचाराच्या व्यक्तीला तिथे पाठवले जाते. यातून सरकारचा कारभार दिसतो आहे. आम्ही म्हणतो तसे वागले पाहिजे, असे यातून सत्ताधार्यांना दाखवून द्यायचे आहे. न्याय व्यवस्थेवर आणि तपास यंत्रणेवर विश्वास नाही, अशा व्यक्तीच्या हाती देशाची सत्ता आहे. त्यामुळे देश धोक्यात आहे, अशी टीका पवार यांनी पंतप्रधान मोदींचे नाव न घेता केली.
पुण्यात राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या संविधान बचाव-देश बचाव मोहिमेच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
