संबंधित माहिती
- नवी मुंबई विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव
- महाविकास आघाडी सरकार पुढील पाच वर्ष टिकणार : शरद पवार
- 'लोकसभा-विधानसभेला शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस जोमाने एकत्र काम करेल' - शरद पवार
- राष्ट्रवादी काँग्रेस : शरद पवार यांना 22 वर्षांत राज्यात एकहाती सत्ता का स्थापन करता आली नाही?
- उद्धव ठाकरे -नरेंद्र मोदींच्या 'त्या' वैयक्तिक भेटीमुळे महाराष्ट्रातील राजकीय गणितं बदलतील?
ठाकरे - मोदी भेटीवर शरद पवार यांची प्रतिक्रीया
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली.दरम्यान यावेळी यांच्यात वैयक्तिक भेटदेखील पार पडली. दरम्यान या वैयक्तिक भेटीवरुन टीका होत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते पक्षाच्या २२ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
“शिवसेनेसोबत आपण कधी काम केलं नाही पण महाराष्ट्र शिवसेनेलासुद्धा कित्येक वर्षांपासून पाहत आहे. माझा यासंबंधीचा अनुभव विश्वास असणाराच आहे. ज्यावेळी जनता पक्षाचं राज्य आलं त्यानंतरच्या कालखंडात निवडणुकीत सगळीकडे काँग्रेसचा पराभव झाला असताना काँग्रेसला पाठिंबा देण्यासाठी एक राजकीय पक्ष पुढे आला….तो म्हणजे शिवसेना. नुसते पुढे आले नाहीत तर इंदिरा गांधींना मदत करण्यासाठी शिवसेना एकही उमेदवार विधानसभा निवडणुकीत उभा करणार नाही असा निर्णय घेतला. पक्षाचा नेता असा निर्णय घेतो तुम्ही विचार करा. पण त्याची चिंता कधी बाळासाहेबांनी केली नाही. त्यांनी इंदिरा गांधींना दिलेला शब्द निवडणूक न लढवत पाळला. त्यामुळे कोणी काहीही शंका घेतली तरी शिवेसनेने ज्या पद्दतीने त्या कालखंडात भक्कमपणाची भूमिका घेतली तीच भूमिका सोडण्यासंबंधी कोणी सांगत असेल तर तसं होणार नाही,” असं शरद पवार म्हणाले आहेत.
