Dharma Sangrah

माझी चूक ती काय ? मला गुणवत्तेवर मिळाली शिष्यवृत्ती!

Updated: शुक्रवार, 8 सप्टेंबर 2017 (12:09 IST)

मी  आयआयटी मद्रासमधून शिक्षण पूर्ण केलं आहे. त्यावेळी माझे वडील मंत्री नव्हते. युकेच्या युनिव्हर्सिटी ऑफ ससेक्समध्ये मी माझं एम एस्सी पूर्ण केलं. याठिकाणी मी गुणवत्तेनुसार माझा प्रवेश आणि शिक्षण झालं. विद्यापीठाने गुणवत्तेमुळे मला शिष्यवृत्ती दिली (सरकारने नव्हे). अवकाश संशोधनात काम करायचं हे माझं स्वप्न होत त्यानुसार मी एक एक पायरी चढत गेले तीही गुणवत्तेनुसारच, त्यावेळी माझे वडील मंत्री नव्हते.

अॅस्ट्रोफिजिक्स या विषयात जगातल्या पहिल्या सव्वीसव्या विद्यापीठात माझी निवड झाली. ती गुणवत्तेनुसारच झाली आहे. हे सत्य आहे.मला यापूर्वी गुणवत्तेनुसार परदेशातल्या विद्यापीठांनी शिष्यवृत्ती दिली आहे. पण पीएचडीसाठी शिष्यवृत्तीची या विद्यपीठात सवलत नाहीय. गुणवत्तेनुसार माझी निवड झाली आहे तर मी याच विद्यापीठात  प्रवेश घेणार म्हणून मी राज्य सरकारकडे शिष्यवृत्तीसाठी अर्ज केला. जगातल्या पहिल्या शंभर विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळत असेल तर त्या विद्यार्थ्याला कुठलाही आर्थिक निकषांची अट नाही हा जीआर आहे. तरी मंत्र्यांची मुलगी आहे यावर वाद होतील हे आधी वडिलांनी निदर्शनास आणून दिले. त्यामुळे वडिलांनी या निवड प्रक्रियेपासून स्वतःला बाजूला केलं. मी कुणाला डावलून शिष्यवृत्ती मिळवली का? जगातल्या पहिल्या 100 विद्यापीठात प्रवेश घेताना आर्थिक निकष लागू नाहीत हा माझ्या शिक्षणापूर्वीचा नियम आहे. यात मी पात्र असेल तर यात माझा दोष आहे का? माझं यापूर्वीच शिक्षण गुणवत्तेनुसार झालं आहे. आता वडिलांच्या मंत्रिपदामुळे माझी गुणवत्ता कमी झाली का?

कुणाचाही हक्क कधी डावलला नाही आणि कधी डावलणारही नाही. वडील मंत्री आहेत म्हणून शिष्यवृत्तीवर वाद होत असेल आणि यामुळे माझी गुणवत्ता झाकोळली जाणार असेल, तर मी शिष्यवृत्ती नाकारत आहे. पण मी शिकणार आणि अवकाश संशोधनात जाणारच. सावित्रीबाई आणि बाबासाहेबांचं शिक्षणासाठीच स्वप्न साकार करण्यासाठी.

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

महाराष्ट्रातील १८ जिल्ह्यांवर दुष्काळाचे संकट; संत्री-कापसाचे मोठे नुकसान, बावनकुळेंची तातडीची बैठक

नागपूर जिल्ह्यात जादूटोणा केल्याच्या संशयावरून सासऱ्याने कुऱ्हाडीने सुनेची हत्या केली

गणेशोत्सवात शांतता राखा; मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनाच्या घोषणेवर बावनकुळेंचे महत्त्वाचे वक्तव्य

पुण्यातील पाषाण-बावधन रस्त्यावर मॉर्निंग वॉक करत असलेल्या सॉफ्टवेअर इंजिनिअरला कारने चिरडले

LIVE: मनोज जरांगे यांच्या मुंबईत आंदोलनाच्या घोषणेवर बावनकुळे यांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments