1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 19 सप्टेंबर 2021 (10:19 IST)

सरकार टिकणार हे सांगणं म्हणजे दुबळेपणा लपवण्याचा प्रयत्न - आशिष शेलार

To say that the government will survive is to try to hide the weakness - Ashish Shelar Maharashtra News Regional Marathi News In Webdunia Marathi
"तुमचं सरकार पाच वर्षे टिकणार असेल तर तुम्हाला बोलावं का लागत आहे? सरकार टिकणार हे सांगणे म्हणजे आपल्या अंतर्गत असलेला दुबळेपणा लपवण्याचा प्रयत्न आहे," अशी टीका भाजप नेते आशिष शेलार यांनी केली आहे.
 
आपले पाप झाकण्यासाठी देखणेपणाने का होईना बोलावं लागतं. संजय राऊत तेच करत आहेत. मोदी यांच्या नावावर मतं मिळवायची आणि जिंकून आल्यावर दुसरीकडे जायचं. शिवसेना दुबळी आहे. त्यामुळेच ते आता पळ काढण्याचा प्रयत्न करत आहेत,असं शेलार यांनी म्हटलं.