संबंधित माहिती
- नेहा पेंडसे सीक्रेट एंगेजमेंट, यूजर्स म्हणाले याहून चांगला मिळेल
- पूरग्रस्त भागातील नागरिकांचे आजारनिहाय सर्वेक्षण
- केंद्र सरकारकडे पूरग्रस्त भागासाठी 6 हजार 800 कोटी रुपयांची मागणी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
- लातूरकर देखील करत आहेत पूरग्रस्त सांगलीला मदत
- बकऱ्याची कुर्बानी न देता त्याचा संपूर्ण खर्च पूरग्रस्तांना देण्याचा निर्णय
पूर असताना सदाभाऊ खोत तुम्ही कुठे होता? – आ. जितेंद्र आव्हाड
राज्यात निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीवर राजकारण करण्याचे काम सदाभाऊ खोत करत आहेत. खोत यांनी महापुरामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचे भान न ठेवता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर टीका केली. पण पूर असताना सदाभाऊ तुम्ही कुठे हुंदडत होतात, असा खोचक सवाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आ. जितेंद्र आव्हाड यांनी केलाय. आमच्या पक्षाचे अध्यक्ष, ८० वर्षांचा तरूण पुराची पाहणी करण्यात व्यस्त आहे.
सांगली कोल्हापूर जिल्ह्यात तब्येतीची पर्वा न करता पूरग्रस्तांना दिलासा देण्यासाठी फिरत आहे. त्यामुळे सदाभाऊंनी राजकारण न करता संकटग्रस्तांचे डोळे पुसण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे, असे आव्हाड म्हणाले.
