संबंधित माहिती
- हिंगोली जिल्ह्यात पावसाची पुन्हा हजेरी, राज्य महामार्गावरील वाहतूक बंद
- राज्यात मराठवाड्यात पुढील 48 तासांत पावसाची मुसळधार हजेरी
- पुरामुळे कोल्हापूर सांगलीत स्थिती गंभीर नद्यांच्या पातळीत वाढ
- राज्यात पाऊस घेणार 3 दिवस विश्रांती! हवामान विभागाची माहिती
- पुण्यात पावसानंतर सारखं पाणी का साचतं? कमी वेळात जास्त पाऊस की इतर कारणे? जाणून घ्या
हिंगोली जिल्ह्यात वीज कोसळून महिलेचा मृत्यू
सध्या राज्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाने झडी लावली असून शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यात हिवरखेडा साखरा परिसरात पावसाने हाहाकार माजवला असून वीज पडून एका शेतकरी महिलेचा मृत्यू झाला आहे.
तर पन्नास हेकटरवरील शेतीत कापूस, उडीद, मूग, सोयाबीनच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
हिंगोली जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली असून शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली असून साखरा शिवारात शेतात पतीसोबत काम करणाऱ्या शेतकरी महिलेवर वीज कोसळून तिचा जागीच दुर्देवी अंत झाला.तर महिलेचा पती गंभीर भाजला आहे.त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी महिलेची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे.
Edited by - Priya Dixit
