Marathi Biodata Maker

कोजागरी पौर्णिमा 2025 : आश्विन पौर्णिमेला 'कोजागरी' का म्हणतात, महत्त्व जाणून घ्या

सोमवार, 6 ऑक्टोबर 2025 (06:08 IST)
कोजागरी पौर्णिमा 2025 : कोजागरी पौर्णिमा, जी आश्विन महिन्यातील पौर्णिमेला साजरी केली जाते, ही हिंदू संस्कृतीत विशेष स्थान राखणारी पौर्णिमा आहे. या रात्री चंद्र पूर्ण तेजस्वी आणि गोलाकार दिसतो, ज्यामुळे या रात्रीला "कोजागरी" (कोण जागे आहे?) असे नाव पडले आहे. 
ALSO READ: Ashwin Purnima 2025 आश्विन पौर्णिमा २०२५ तारीख व शुभ मुहूर्त
पौराणिक कथेनुसार, या रात्री लक्ष्मी माता पृथ्वीवर भ्रमण करते आणि जे कोणी जागे राहून तिची पूजा करतात, त्यांच्यावर ती कृपा करते. या रात्री जागरण आणि पूजा करण्याची प्रथा आहे, ज्यामुळे संपत्ती आणि समृद्धी प्राप्त होते अशी श्रद्धा आहे.आश्विन पौर्णिमेला 'कोजागरी' म्हणतात कारण या दिवशी रात्री उत्तररात्री लक्ष्मीदेवी पृथ्वीवर फिरत येऊन 'को जागर्ति' (कोण जागत आहे?) असे विचारते, आणि जो जार्गत असतो त्याला ती आशीर्वाद देते असे मानले जाते. 'को जागर्ति' या संस्कृत शब्दाच्या आधारावर या पौर्णिमेला 'कोजागरी पौर्णिमा' असे नाव मिळाले आहे. 
 
कोजागिरीचे महत्त्व -
या दिवशी लक्ष्मी मातेची पूजा केली जाते. देवी लक्ष्मी कोजागिरीच्या रात्री पृथ्वीवर भ्रमण करते आणि कोण जागे आहे असे विचारते. या दिवशी घराला स्वच्छ करून दीप प्रज्वलन करून दुधाला आटवून त्यात सुकेमेवे, चारोळ्या घालून रात्री चंद्राच्या प्रकाशात ठेवतात. जेणे करून चंद्रमाच्या अमृत किरणा त्यात पडतील. त्या दुधाचा देवी लक्ष्मीला नैवेद्य दाखवतात. 
ALSO READ: Kojagiri Vrat Katha शरद पौर्णिमेची पौराणिक कथा
ही पौर्णिमा शरद ऋतूच्या आगमनाची प्रतीक असल्याने ह्या पौर्णिमेला शरद पौर्णिमा असेही म्हणतात. 
या रात्री चंद्रमाचे सौंदर्य बघण्यासाठी कुटुंबातील सर्व जण एकत्र येतात आणि चंद्रमाच्या प्रकाशात घरातील मोठ्या अपत्याचे मग ती मुलगी असो किंवा मुलगा. पाटावर बसवून औक्षण केले जाते. आणि त्यांना भेटवस्तू दिली जाते. रात्री जागरण केले जाते गाणे आणि नृत्याचा आनंद घेतला जातो. 
ALSO READ: Kojagiri Purnima 2025 Wishes कोजागिरी पौर्णिमा शुभेच्छा मराठीत
कोजागिरीचा संबंध शेतकऱ्यांशी देखील आहे. कारण हा काळ खरीप पिकांच्या कापणीचा आहे. शेतकरी आपल्या पिकांच्या समृद्धीसाठी लक्ष्मी आणि इंद्रदेवाची पूजा करतात.
या रात्री देवी लक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करताना को जागृती असे विचारते. त्यामुळे या रात्री जागरण करणे महत्त्वाचे आहे. जेणे करून देवी लक्ष्मी आशीर्वाद देते. 
चन्द्रमाचे औक्षण करून त्याला आटवलेल्या दुधाचा नैवेद्य दाखवतात. 
शरद पौर्णिमेच्या रात्री चंद्रप्रकाशात ठेवलेली खीर खाण्याची प्रथा आहे. यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते असे मानले जाते.
आयुर्वेदानुसार, या रात्री चंद्राची किरणे शीतल आणि औषधी गुणांनी युक्त असतात, ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.हा सण शरद ऋतूच्या सौंदर्याचा आनंद घेण्याचा सण आहे. 
 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By - Priya Dixit  
 

सर्व पहा

बुधवारी या ५ पैकी कोणतीही एक गोष्ट करा, समस्यांपासून मुक्ती मिळेल!

भीम अहोरात्र भुकेला राहून का करायचा 'हे' व्रत? वाचा निर्जला एकादशीची रंजक पौराणिक कथा

बुधवारी करा गणपतीची ही खास पूजा; सर्व अडथळे दूर होतील

एकवीस स्वर्ग मुकुट सप्तही पाताळ चरण आरती बुधवारची

Nirjala Ekadashi 2026 Wishes in Marathi निर्जला एकादशी शुभेच्छा मराठी संदेश

सर्व पहा

Hanuman Chalisa Path Benefits हनुमान चालीसा पठणाचे फायदे: मानसिक शक्ती दुप्पट कशी वाढते?

बुध ग्रहाची वक्री चाल सुरू! २९ जूनपासून 'या' राशींचे भाग्य उजळणार, तर कोणाला राहावे लागेल सावध?

Belly fat yoga: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी 5 उत्तम योगासने, यापैकी कोणतेही एक करून पहा

खूप थंड पाणी पिणे चांगले की वाईट? सत्य जाणून घ्या

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये १५०० प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ) पदां साठी भरती सुरु

पुढील लेख
Show comments