Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अक्षय कुमारमुळे ट्रेंड होणारं 'बॉटल कॅप चॅलेंज' नेमकं काय आहे ?

Updated: गुरूवार, 4 जुलै 2019 (13:40 IST)
 
बाटलीचं झाकण उघडण्याचा हा व्हीडिओ म्हणजे दुसरं तिसरं काहीही नसून ते आहे सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिंग असलेलं 'बॉटल कॅप चॅलेंज'.
 
ट्विटर, इन्स्टाग्रॅम आणि फेसबुकवर सध्या अनेकजण अशा प्रकारचा व्हिडिओ तयार करून टाकताना दिसत आहे. रिव्हर्स किकच्या माध्यमातून आपण किती फिट आहोत हे सिद्ध करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
 
कसं सुरू झालं 'बॉटल कॅप चॅलेंज'?
बॉटल कॅप चॅलेंज 25 जून रोजी सुरू झाल्याचं सांगण्यात येत आहे. MMA म्हणजेच 'मिक्स्ड मार्शल आर्ट्स'च्या फायटर्सनी मजेत हे चॅलेंज सुरू केलं.
 
सर्वप्रथम कझाखस्तानचा तायक्वांदो चॅम्पियन फराबी डेवलेचिन याने याची सुरूवात केली. त्यानंतर फॅशन डिझायनर एरलसन हुग, मार्शल आर्टिस्ट मॅक्स हॉलोवे, गायक-संगीतकार जॉन मायर आणि डेथ रेस फेम अभिनेता जेसन स्टॅथम यांनीही हे चॅलेंज स्वीकारून याचा व्हीडिओ बनवला. त्यानंतर जगभरात हे चॅलेंज व्हायरल होऊ लागलं.
 
अनेक सेलेब्रिटींनी हे चॅलेंज स्वीकारलं आणि व्हीडिओ पोस्ट केले.
 
जेसन स्टॅथम यांनी याचा व्हीडिओ पोस्ट करताच अक्षय कुमारने त्यातून प्रेरणा घेत बाटलीचं झाकण काढतानाचा स्वतःचा व्हिडिओ बनवला. अक्षयकुमारने ट्विटमध्ये लिहिलं, "मी स्वतःला थांबवू शकलो नाही. माझा अॅक्शन आयडॉल जेसन स्टॅथमकडून प्रेरणा घेत आहे. सर्वांनी हे चॅलेंज ट्राय करा, चॅलेंज उत्तमरित्या करणाऱ्यांचे व्हीडिओ मी रिट्विट/रिपोस्ट करीन."
 
यासोबतच अक्षयकुमारने 'फिटइंडिया' हॅशटॅग वापरत फिटनेसचा संदेशही या माध्यमातून दिला. त्यामुळे त्याच्या पोस्टनंतर परदेशात सुरू झालेल्या या चॅलेंजची क्रेझ आता भारतातही सुरू झाली आहे.
 
'गली बॉय' फेम अभिनेता सिद्धार्थ चतुर्वेदी, गुरमित चौधरी यांनीही उत्तमरित्या हवेत गिरकी घेत रिव्हर्स किक मारत बाटल्यांची झाकणं उघडली. सध्या सोशल मीडियावर 'बॉटल कॅप चॅलेंज'चीच चर्चा असून अनेक नेटिझन अनेक आगळ्यावेगळ्या प्रकारचे व्हीडिओ पोस्ट करताना दिसत आहेत.

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

पुढील लेख
Show comments