suvichar

सफर निसर्गरम्य बूंदीची

शनिवार, 21 सप्टेंबर 2024 (06:37 IST)
भटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये  गेल्यावर जयपूर, उदयपूर, जैसलमेर, जोधपूर अशा शहरांची सैर केली जाते. मात्र याराज्यात सुंदर आणि नयनरम्य अशी बरीच ठिकाणं आहेत. त्यापैकी एक ठिकाण म्हणजे बूंदी. 

बूंदी शहराच्या सभोवताली अरवली पर्वतारांगा आहेत. या पर्वतारांगांच्या मधोमध वसलेलं बूंदी आपल्याला आकर्षित करतं. राजस्थानातली बरीचशी शहरं किल्ले आणि महालांसाठी प्रसिद्ध आहेत. पण बूंदी खास चित्रकलेसाठी ओळखलं जातं. इथल्या चित्रकलेला खूप प्राचीन इतिहास आहे. कलेची आवड असणार्‍यांना इथे सुंदर अशा चित्रकृती बघता येतील.

बूंदीमध्ये किल्लेही आहेत. इथला एक किल्ला दोन भागांमध्ये विभागला गेला आहे. या किल्ल्याचा वरचा भाग तारागड म्हणून ओळखला जातो आणि खालच्या भागाला फक्त गड असं म्हणतात. 1242 मध्ये राव देवाजीने या शहराची स्थापना केली. बूंदा मीणा या सरदाराच्या नावावरून या शहराला बूंदी हे नाव पडल्याचं म्हटलं जातं. या शहरातलं हाथी पोल हे द्वार भव्यतेचं प्रतीक आहे. हे द्वार स्थापत्यकलेचा उत्तम नमुनाही आहे. हे द्वार बूंदीतलं एक खास आकर्षण आहे. पावसाळ्यात या शहराचं सौंदर्य अधिकच खुलतं. नोव्हेंबर-डिसेंबरमध्येही इथे जाता येईल. कोटा शहरापासून बूंदी फक्त 35 किलोमीटरवर आहे. साधारण तासाभरात कोटाहून बूंदीला जातायेईल. त्यामुळे राजस्थानला   गेल्यावर बूंदीची सैर नक्की करा.
अभय अरविंद 

सर्व पहा

अक्षय कुमारच्या 'वेलकम टू द जंगल'चा विनोदी ट्रेलर प्रदर्शित; चित्रपटात ३० हून अधिक मुख्य आणि सहाय्यक कलाकार

हास्य आणि गावाकडच्या वास्तवाचा अनोखा संगम असलेल्या 'ग्राम चिकित्सालय सीझन २' चा ट्रेलर प्रदर्शित झाला

आमिर खान प्रॉडक्शन्स आणि 'लगान'ला २५ वर्षे पूर्ण आमिर खान भव्य पार्टी देणार, संपूर्ण कलाकार आणि क्रू उपस्थित राहणार

2026 आणि 2027 मध्ये आपल्या पदार्पणासह बॉलिवूडमध्ये एंट्री करणार हे नवे चेहरे

श्रद्धा कपूरच्या नवीन चित्रपट 'ईथा'च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर

सर्व पहा

गदर'ने विक्रम रचला! प्रेक्षकसंख्येच्या आकडेवारीबाबत अमिशा पटेलचा धाडसी दावा

महादेवाचे अश्रू पडले, त्या ठिकाणी आजही पाणी आहे; पाकिस्तानातील या चमत्कारिक कुंडाचे रहस्य तुम्हाला माहित आहे का?

टीव्ही अभिनेत्री सुरभी ज्योती गोंडस मुलीची आई झाली

आकाशाला स्पर्श करण्याच्या इच्छेपासून ते कोडिंग शिकवण्यापर्यंत, सुशांत सिंग राजपूतची ५० अपूर्ण स्वप्ने

आमिर खानने 'लगान' आणि त्याच्या प्रोडक्शन हाऊसच्या २५ वर्षांच्या वर्धापनदिनाचा सोहळा साजरा केला

पुढील लेख
Show comments