Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

संत ज्ञानेश्वर महाराष्ट्राचे अमूल्य रत्न

Updated: शुक्रवार, 12 जून 2020 (21:39 IST)
 
सन्यास घेतल्यानंतर त्यांना अपत्ये प्राप्ती झाल्यामुळे त्यांना संन्यासींची मुले म्हणून अपमान मिळत असे. विठ्ठलपंतांनी सामाजिक आज्ञेनुसार मरण पत्करावे लागले होते. 
 
लहानग्या ज्ञानेश्वराच्या डोक्यावरून आई वडिलांची छत्रछाया गेली. त्याकाळी सर्व ग्रंथ संस्कृतमध्ये असायचे कोणालाही संस्कृत येत नसे. पण तेजस्वी असे ज्ञानेश्वरांनी फक्त वयाच्या 15 व्या वर्षी गीतेवरील मराठीमध्ये ज्ञानेश्वरीची रचना केली. 
 
खूपच लहानग्या वयात ह्यांना वेगवेगळ्या संकटातून जावे लागले. त्यांच्याकडे वास्तव्यास साठी घर देखील नसे. हे सर्व भाऊ बहीण शुध्दीपत्र प्राप्तीसाठी धर्मक्षेत्र पैठण गेले. अशी आख्यायिका आहे की इथे त्यांनी त्यांची चेष्ठा करणाऱ्या ब्राह्मणाच्या समोर म्हशीच्या तोंडातून वेदांचे उच्चारण करविले होते. ह्यांनी तपस्वी चांगदेव च्या स्वागतासाठी ज्या भिंतीवर बसले होते तीच भिंत चालवली होती. मराठीच्या गाण्यामध्ये ही ओळ "चालविली जड भिंती। हरविली चांग्याचीं भ्रांती" म्हटली जाते. ह्याचा या चमत्कारामुळे प्रभावित होऊन त्यांना पैठणच्या विद्वानांनी शुध्दीपत्रक दिले. शुध्दीपत्रक घेउन हे चौघे प्रवरा नदीच्या काठी नेवासे गावात पोहोचले. 
 
ज्ञानेश्ववरांचे थोरले बंधू निवृत्तीनाथांना नाथ संप्रदायाच्या गहिनीनाथांकडून ज्ञान मिळाले असे. जे त्यांनी ज्ञानदेवांच्याद्वारा आपल्या बहिणी मुक्ताबाईंकडे पोहोचविले. ज्ञानदेवांनी आबाळवृद्धांना आध्यात्माची ओळख करून देण्यासाठी मराठीमध्ये श्रीमद् भगवद्गीतेवर भाष्य लिहिले. ज्याला आपण ज्ञानेश्वरी म्हणून ओळखतो. हे पूर्ण झाल्यावर ज्ञानेश्वरांनी आपल्या राजकीय तत्वांशिवाय स्वतंत्र अनुभवणारे अमृतानुभव नावाचे दुसरे ग्रंथ लिहिले. तत्पश्चात हे चौघे भाऊ बहीण पुण्याचा जवळ आळंदी गावामध्ये आले. इथून ह्यांनी योगीराज चांगदेवांना 65 ओव्यांचे पत्र लिहिले जे महाराष्ट्रात ' चांगदेव पाषष्ठी च्या नावाने प्रख्यात आहे.
 
लहानांपासून ते महताऱ्यांपर्यंत सर्वाना भक्तिमार्गाला लावून भागवत धर्म स्थापित करून आळंदी मध्ये युवावस्थेत 21 वर्ष 3 महिने आणि 5 दिवसाच्या वयात जिवंत समाधी घेण्याचे ठरवून या संसाराचा त्याग करून आपले नश्वर शरीर सोडले. 
 
ज्ञानदेवांच्या समाधी घेण्याच्या क्षणाचे वृत्तांत संत नामदेवांनी आपल्या लेखामध्ये लिहिले आहे. ते लिहितात की आपले गुरु निवृत्तीनाथांना शेवटचे नमस्कार करून ज्ञानदेव स्थितप्रज्ञ होऊन समाधिमंदिरात जाऊन बसले. त्यांचा गुरूंनी समाधिमंदिराचे दार बंद केले. 
 
ज्ञानेश्वरांनी ही जिवंत समाधी आळंदी गावात संवत मध्ये शके 1217 (वि.संवत 1353 (सन 1296) च्या मार्गशीर्ष वदी(कृष्ण) त्रयोदशीला घेतली जे आता पुण्यापासून तब्बल 14 किलोमीटर लांब प्रख्यात तीर्थक्षेत्र बनले आहे. 
 
ज्ञानेश्वरांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेव पासष्टी आणि अभंग या रचना सर्वमान्य आहे. महाराष्ट्रामध्ये ह्यांचा ग्रन्थ ज्ञानेश्वरीला ;माउली ' असे देखील म्हटले जाते.

सर्व पहा

Pithori Amavasya Matrudin 2026 Wishes in Marathi पिठोरी अमावस्या शुभेच्छा संदेश

Haritalika 2026 : हरितालिकेच्या दिवशी चुकून सुद्धा करू नका हे 5 काम

कॉफी फक्त पिण्यासाठीच नाही तर ती घरगुती कामांसाठीही खूप उपयुक्त आहे! वाचा

नथीचा तोराच वेगळा! या गणेशोत्सवात ट्राय करा नथीचे हे खास आणि ट्रेन्डी प्रकार

घरातील या एका जागी चप्पल ठेवणे चुकीचे? काय सांगते वास्तुशास्त्र

सर्व पहा

मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान, सरकारने दुसरा पर्याय नसल्याचे सांगितल्याने जरांगे पाटील यांना मोठा धक्का

चीनमध्ये गावात भूस्खलन, १२ जणांचा मृत्यू

रिल्स बनवणे महागात पडले; ड्रोनने चित्रीकरण करणाऱ्या चार तरुणांवर पोलिसांनी कारवाई केली

पुण्यातील कोंढवा येथे जुन्या वैमनस्यातून गुन्हेगारांनी गोळीबार केला; १० आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

LIVE: पुण्यातील कोंढवा येथे जुन्या वैमनस्यातून गुन्हेगारांनी गोळीबार केला

पुढील लेख
Show comments