suvichar

भन्साळींच्या आगामी चित्रपटात रणवीरऐवजी हृतिक?

शुक्रवार, 27 एप्रिल 2018 (12:51 IST)
चित्रपट निर्माते, दिग्दर्शक संजय लिला भन्साळींचा सर्वात आवडता अभिनेता रणवीर सिंह असून भन्साळी यांनी रणवीरसोबत आतापर्यंत तीन चित्रपट केले. हे तिन्ही चित्रपट तुफान गाजले. भन्साळी यांनी रणवीरला 'राम-लीला', 'बाजीराव-मस्तानी' आणि त्यानंतर 'पद्मावत' या तिन्ही चित्रपटात संधी दिली. या संधीचे रणवीरने सोने केले. बॉक्स ऑफिसवर या तिन्ही चित्रपटांनी कोट्यवधींचा गल्ला कावला. दीपिका- रणवीर ही भन्साळींची जोडी हिट ठरली पण, आता भन्साळींच्या आगामी चित्रपटात ही जोडी दिसणार नाही. भन्साळी 'पद्मावत'च्या दमदार यशानंतर लवकरच आणखी एक ऐतिहासिक चित्रपट घेऊन येणार आहेत. भन्साळी यांनी या चित्रपटात रणवीरच्या नावाऐवजी हृतिकच्या नावाचा विचार केला असल्याचे वृत्त आहे. रणवीरऐवजी हृतिक या चित्रपटासाठी सर्वोत्तम ठरू शकतो अशी आशा भन्साळींना आहे म्हणूनच या चित्रपटासाठी हृतिकला त्यांनी गळ घातली आहे. याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हृतिकनेही या चित्रपटासाठी लागलीच होकार भरला असल्याचेही म्हटले जात आहे. भन्साळींच्या 'गुजारिश' चित्रपटात हृतिकने मुख्य भूमिका साकारली होती. तूर्तास या चित्रपटाचे नाव 'प्रिन्स' असे निश्चित करण्यात आल्याचे वृत्त आहे. अर्थात हृतिक नावावरून या चित्रपटात एखादी ऐतिहासिक भूमिका साकारताना दिसणार आहे.

सर्व पहा

धर्मेंद्र यांच्या बायोपिकमध्ये मुख्य अभिनेता कोण साकारणार?बॉबी देओलने हे उत्तर दिले

खिशाला कात्री न लावता सरकारी बजेट पॅकेजेसमध्ये फॅमिलीसोबत सुरक्षितपणे फिरून या

चित्रपट महामंडळाला स्थिर आणि कृतिशील कार्यकारिणी देण्याची समर्थ पॅनलची ग्वाही

रणवीर सिंगने एफडब्ल्यूआयसीई (FWICE) बंदीविरोधात न्यायालयात धाव घेतली, कायदेशीर नोटीस पाठवली

'दुसरा राम कोणालाही बघायचा नाही', रामायणममधील रणबीर कपूरच्या कास्टिंगच्या वादावर अरुण गोविल यांचे मोठे विधान

सर्व पहा

शेखर सुमनच्या गर्विष्ठ राजा आणि त्याच्या दरबारातील खुशामतखोराच्या व्हिडिओमुळे एवढा गदारोळ का झाला

ताल'च्या सिक्वेलवर सुभाष घई यांनी संकेत दिले, चित्रपट समीक्षक रॉजर एबर्ट यांनी प्रशंसा केली

हरियाणवी गायक आणि विनोदी कलाकार पेप्सी शर्मा यांचे वयाच्या ३८ व्या वर्षी निधन

मराठी चित्रपट 'तिघी' आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकला, न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये सर्वोत्कृष्ट पटकथेचा पुरस्कार पटकावला

राखी गुलजार यांनी आमिर खानच्या तिसऱ्या लग्नाला पाठिंबा दिला; म्हणाल्या-"वयाच्या ६० व्या वर्षी लग्न करण्यात काय अडचण?"

पुढील लेख
Show comments