Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

वाढत्या प्रादुर्भावामुळे 7 दिवसांचा लॉकडाऊन : एकनाथ शिंदे

Updated: शुक्रवार, 26 जून 2020 (18:50 IST)
 
त्यानंतर एकनाथ शिंदेंनी लॉकडाऊन घोषित करण्याचा निर्णय घेतला. लॉकडाऊन काळात घरोघरी मास स्क्रिनिंग होणार असल्याचीही माहिती देण्यात आली आहे.
विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी नवी मुंबईतील कोरोना परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला. कोरोनाच्या वाढत्या प्राद्रुर्भावाचा ठपका ठेऊन महापालिका आयुक्तांच्या तडकाफडकी बदल्या करण्याचा सपाटा महाविकास आघाडी सरकारने लावला आहे. 
 
पण यामुळे या संकटमय परिस्थितीत कोविड योद्धे म्हणून काम करणा-या या सनदी अधिका-यांचे मनोधैर्य खचू लागले आहे. जर आयुक्तांची बदली करण्याचा न्याय सरकार लावणार असेल तर संबंधित जिल्ह्याचा पालक मंत्री व त्या खात्यांच्या मंत्र्यांना जबाबदार धरून त्यांचाही राजीनामा सरकार घेणार का असा रोखठोक सवाल विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी उपस्थित केला.
 
जर मंत्र्यांचे राजीनामा घेतले तर महाराष्ट्रात कोरोनाची वाढती व गंभीर परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरलेल्या महाविकास आघाडी सरकारचाही राजीनामा आता जनतेला मागावा लागेल असा इशाराही दरेकर यांनी आज दिला.
नवी मुंबई महापालिका परिसरात गेल्या दहा दिवसात मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आहे. या वाढत्या प्राद्रुर्भावाचा आढावा घेऊन सद्यस्थिती काय आहे, महापालिका कोणत्या प्रकारच्या उपाययोजना करण्यात येत आहेत, आरोग्य व्यवस्था कशाप्रकारे कार्यान्वित होत आहेत आदि विषयां सदर्भात दरेकर यांनी तपशीलवार माहिती घेतली. नवी मुंबई महानगरपालिका कार्यालयात बैठक आयोजित करून आयुक्त अण्णासाहेब मिसाळ आणि महापालिका प्रशासनाकडून कोरोना संदर्भात सविस्तर माहिती घेण्यात आली.
 
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे महापालिका आणि पोलिसांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. शहरातील 44 कंटेन्मेंट झोनमध्ये 7 दिवसांचा लॉकडाऊन असेल. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका आणि पोलिसांची बैठक घेतली. 

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

उत्तम पीक येण्यासाठी आणि चांगले उत्पादन मिळवण्यासाठी शेतीची महत्त्वाची कामे

LIVE: जीशान सिद्दीकीला जीवे मारण्याच्या धमक्या आल्या

रेल्वे प्रवास पूर्ण झाल्यावरही तिकिटाचा परतावा मिळू शकतो; पण हा लाभ कोणाला मिळतो?

तरुण तेजपाल यांना १० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार

भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांची मालिका १५ ऑगस्टपासून सुरू होणार; ७ ऑगस्ट रोजी तीन दिवसांचा सराव सामना

पुढील लेख