Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Omicron : कोरोनाची लस घेतल्यानंतर काही जणांना रक्ताच्या गुठळ्या का होतात?

Updated: शनिवार, 4 डिसेंबर 2021 (07:51 IST)
जगभरात आतापर्यंत या लशीचे काही अब्ज डोस दिले गेले आहेत. भारतातही एक अब्ज अकरा कोटीच्या वर डोस कोव्हिशिल्डचे आहेत.
 
पण, युकेमध्ये दिलेल्या दोन कोटी पन्नास लाख लोकांपैकी 73 लोकांचा रक्ताच्या गुठळ्या होऊन मृत्यू झाला आणि तिथून भुवया उंचावल्या.
युरोपच्या शेजारी देशांमधूनही अशी काही प्रकरणं समोर आली. त्यामुळे मग कोरोना लशीमुळे आणि त्यातही ऑक्सफर्डमध्ये बनलेल्या या लशीमुळे रक्ताच्या गुठळ्या होतात का आणि का होतात यावर संशोधन सुरू झालं. अशा घटना जरी अत्यल्प असल्या तरी त्यामुळे सुधारित लस बनवताना हा धोकाही टाळता येणार होता.
 
लशीमुळे रक्ताच्या गुठळ्या का होतात?
ही लस कोरोना व्हायरसच्या आतील जेनेटिक घटक आणि सर्दी-तापाच्या एका विशिष्ट विषाणूची मिळून बनली आहे.
खरंतर लस स्नायूंमध्ये टोचली जाते. पण, कधी कधी रक्तात मिसळते.
तशी ती रक्तात मिसळली तर रक्तातल्या प्लेटलेटमधलं एक प्रोटीन तिच्याकडे आकर्षित होतं.
काही वेळा या प्लेटलेटची ओळख न पटल्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती तिलाच विषाणू समजून तिच्याविरोधात अँटीबॉडीज् तयार करते.
अशा अँटीबॉडीज् या प्लेटलेट भोवती तयार होतात आणि त्यातून रक्ताच्या गुठळ्या तयार होतात.
रक्ताच्या गुठळ्या का होतात यावर संशोधन करणारे कार्डिफ विद्यापीठाचे संशोधक डॉ. अॅलन पार्कर याविषयी म्हणतात, "ही लस बनवताना मृत कोरोना व्हायरसबरोबरच सर्दी-तापाचा एक विषाणू एडेनोव्हायरसही वापरण्यात आला आहे. आणि या व्हायरसचा पृष्ठभाग बराचसा सपाट असतो.
 
"त्यामुळे रक्तातली प्लेटलेट त्याकडे आकर्षित होते आणि मग रक्ताची गुठळी तयार होण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते."
 
ऑक्सफर्ड लशीवरील हे संशोधन का महत्त्वाचं?
आता झालेल्या या संशोधनात ऑक्सफर्ड विद्यापीठाची टीमही सहभागी झाली होती.
 
काही विशिष्ट वयोगटातल्या आणि विशिष्ट प्रकारच्या लोकांमध्येच अशी गुठळी होते का, तसंच रक्ताची गुठळी कुठल्या अवयवात तयार होऊ शकते अशा प्रकारचे निष्कर्ष अजून संशोधकांना काढता आलेले नाहीत. त्या दिशेनं काम अजूनही सुरू आहे. पण, आतापर्यंत लशीवर झालेलं संशोधनही पुरेसं आश्वासक असल्याचं विद्यापीठाने आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.
या पत्रकात म्हटलंय, "रक्ताच्या गुठळ्या होण्याचं प्रमाण हे अत्यल्प होतं आणि आहे. उलट या लशीने आतापर्यंत जगभरात करोडो लोकांचे जीव वाचवले आहेत. पण, लशीवरच्या प्रत्येक संशोधनाचं आम्ही स्वागतच करतो. कारण, असे संभाव्य धोके समजले तर लशीच्या सुधारित आवृत्त्या आणताना आम्हाला मदतच होणार आहे."
 
जगभरात कोरोनाचे नवनवे व्हेरियंट येतायत तसं सध्याच्या लशींचे नवीन फॉर्म्युले आवश्यक ठरणार आहेत.
अमेरिकेत फायझर आणि मॉडर्ना या दोन्ही लशींनी शंभर दिवसांत आताच्या लशींच्या सुधारित आवृत्त्या आणण्याची घोषणा केली आहे. त्यासाठी आजूबाजूच्या कोरोना परिस्थितीचा आढावा आणि लशींवर सातत्याने संशोधन महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे कोरोना लशीची लोकांमधली विश्वासार्हताही वाढणार आहे.
 
जगभरात लशींबद्दल असलेल्या गैरसमजांमुळे लोक लस घ्यायला पुढे येत नाहीयेत. लसीकरणाचं प्रमाणही अशा संशोधनामुळे वाढू शकेल. कारण, शेवटी कोरोना उद्रेक आटोक्यात आणण्याचा एकमेव उपाय आपल्याला सध्या ठाउक आहे तो म्हणजे कोरोनाविरोधी लस.

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

नागपूरमध्ये स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ, महानगरपालिकेने सतर्कतेचा इशारा दिला!

एअर इंडियाची मोठी घोषणा, मुंबई-टोरोंटो थेट विमानसेवा २५ ऑक्टोबरपासून सुरू होणार

LIVE: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना 'गुंगी गुडिया' म्हणत काँग्रेसने सोडले टीकास्त्र

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना 'गुंगी गुडिया' म्हणत काँग्रेसने सोडले टीकास्त्र , राष्ट्रवादी काँग्रेसने दिले प्रत्युत्तर

सीएसएमटी आणि सावंतवाडी दरम्यान नवीन नियमित रेल्वेगाडी धावणार

पुढील लेख
Show comments