Marathi Biodata Maker

तीन देशात होऊ शकते आयपीएलच्या तेराव्या हंगामाचे आयोजन

गुरूवार, 7 मे 2020 (14:55 IST)
पुढील काही महिन्यांमध्ये देशातील कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव नियंत्रणात आला नाही, तर आयपीएल देशाबाहेर खेळवण्याचा पर्यायही बीसीसीआयसमोर खुला आहे. देशभरात पसरलेल्या कोरोना विषाणूचा फटका क्रीडा जगतालाही बसला आहे.
 
आयपीएलचा तेरावा हंगाही बीसीसीआयने पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित केला आहे. 29 मार्चपासून सुरु होणारा आयपीएलचा हंगाम बीसीसीआयने सर्वप्रथम 15 एप्रिलर्पंत पुढे ढकलला. मात्र परिस्थिती नियंत्रणात न आल्याने बीसीसीआयने या हंगामाचे आयोजन स्थगित केले आहे. आयपीएल रद्द झाल्यास बीसीसीआयला हजारो कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान होऊ शकते. त्यामुळे स्पर्धा पूर्णपणे रद्द न करता वर्षाअखेरीस आयपीएल खेळवता येईल का, याची चाचपणी बीसीसीआय करत आहे.
 
बीसीसीआयने श्रीलंका, न्यूझीलंड आणि दक्षिण अफ्रिकेत ही स्पर्धा घेण्याबाबत विचार सुरू केला आहे.
 
1) श्रीलंका – श्रीलंकेमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाला असला तरीही या देशातील परिस्थिती फारशी गंभीर नाही. लंकन सरकारने आतापर्यंत परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळवले आहे. येत्याकाही दिवसांमध्ये लंकेत परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर इथे आयपीएलचे आयोजन केले जाऊ शकते. काही दिवसांपूर्वी श्रीलंकन क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष शी सिल्वा यांनी बीसीसीआयसमोर आयपीएल श्रीलंकेत भरवण्याचा पर्याय ठेवला होता.
 
2) न्यूझीलंड - इतर देशांच्या तुलनेत न्यूझीलंडमध्येही कोरोना बाधित रुग्णांची संख्या आटोकत आहे. पुढील काही दिवसांत न्यूझीलंडमधील परिस्थिती नियंत्रणात येईल, असा अंदाज वर्तवला जात आहे. याआधी भारतीय खेळाडूंनी न्यूझीलंडचा दौरा केला होता, त्यामुळे इकडचे वातावरण, खेळपट्टी याचा खेळाडूंना अंदाज आहे. अशा परिस्थितीत न्यूझीलंड हा आयपीएलच तेराव्या हंगामच्या आयोजनासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतो.
 
3) दक्षिण आफ्रिका - श्रीलंका आणि न्यूझीलंड या दोन देशांच्या तुलनेत दक्षिण आफ्रिकेत परिस्थिती फारशी योग्य नाही. या देशातही कोरोना बाधित रुग्णांची संख्या जास्त आहे. मात्र येत्या काही दिवसांत परिस्थिती नियंत्रणात आल्यास दक्षिण आफ्रिकेत आयपीएल आयोजनाबद्दल विचार केला जाऊ शकतो. कारण 2009 साली भारतात निवडणुकांमुळे आयपीएलचे आयोजन दक्षिण आफ्रिकेत करण्यात आले होते. त्यामुळे आयपीएलच्या आयोजनासाठी दक्षिण आफ्रिका हा देखील एक उत्तम पर्याय ठरु शकतो.
 

सर्व पहा

शनिदेवाच्या पूजेत तांब्याची भांडी का वापरू नयेत? नेमकं कारण काय?

जूनमध्ये गुरूचा महापरिवर्तन योग; ३ राशींचे भाग्य उजळणार

हॉटेलमधून मागवण्याऐवजी घरीच बनवा Restaurant Style Mix Veg

रक्तदाब नियंत्रणासाठी वेलची ठरते रामबाण? जाणून घ्या तिचे आश्चर्यकारक फायदे

Career in Polytechnic After 12th: बारावीनंतर या टॉप पॉलिटेक्निक कोर्समध्ये डिप्लोमा कोर्स करा

सर्व पहा

भिवंडीतून ५,९२९ किलो मेथॅनॉल जप्त, एफडीएने गोदाम सील केले

LIVE: बालविवाहावर महाराष्ट्र सरकारची कठोर भूमिका

नागपूरच्या महाल परिसरातील एका कपड्यांच्या शोरूमला भीषण आग लागली

सरकारने मागण्या मान्य केल्यावर मनोज जरांगे यांनी उपोषण संपवले

हरमनप्रीत कौरने टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ४,००० धावांचा टप्पा गाठत नवा विक्रम रचला

पुढील लेख
Show comments