Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

तीन देशात होऊ शकते आयपीएलच्या तेराव्या हंगामाचे आयोजन

Updated: गुरूवार, 7 मे 2020 (15:04 IST)
 
आयपीएलचा तेरावा हंगाही बीसीसीआयने पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित केला आहे. 29 मार्चपासून सुरु होणारा आयपीएलचा हंगाम बीसीसीआयने सर्वप्रथम 15 एप्रिलर्पंत पुढे ढकलला. मात्र परिस्थिती नियंत्रणात न आल्याने बीसीसीआयने या हंगामाचे आयोजन स्थगित केले आहे. आयपीएल रद्द झाल्यास बीसीसीआयला हजारो कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान होऊ शकते. त्यामुळे स्पर्धा पूर्णपणे रद्द न करता वर्षाअखेरीस आयपीएल खेळवता येईल का, याची चाचपणी बीसीसीआय करत आहे.
 
बीसीसीआयने श्रीलंका, न्यूझीलंड आणि दक्षिण अफ्रिकेत ही स्पर्धा घेण्याबाबत विचार सुरू केला आहे.
 
1) श्रीलंका – श्रीलंकेमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाला असला तरीही या देशातील परिस्थिती फारशी गंभीर नाही. लंकन सरकारने आतापर्यंत परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळवले आहे. येत्याकाही दिवसांमध्ये लंकेत परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर इथे आयपीएलचे आयोजन केले जाऊ शकते. काही दिवसांपूर्वी श्रीलंकन क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष शी सिल्वा यांनी बीसीसीआयसमोर आयपीएल श्रीलंकेत भरवण्याचा पर्याय ठेवला होता.
 
2) न्यूझीलंड - इतर देशांच्या तुलनेत न्यूझीलंडमध्येही कोरोना बाधित रुग्णांची संख्या आटोकत आहे. पुढील काही दिवसांत न्यूझीलंडमधील परिस्थिती नियंत्रणात येईल, असा अंदाज वर्तवला जात आहे. याआधी भारतीय खेळाडूंनी न्यूझीलंडचा दौरा केला होता, त्यामुळे इकडचे वातावरण, खेळपट्टी याचा खेळाडूंना अंदाज आहे. अशा परिस्थितीत न्यूझीलंड हा आयपीएलच तेराव्या हंगामच्या आयोजनासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतो.
 
3) दक्षिण आफ्रिका - श्रीलंका आणि न्यूझीलंड या दोन देशांच्या तुलनेत दक्षिण आफ्रिकेत परिस्थिती फारशी योग्य नाही. या देशातही कोरोना बाधित रुग्णांची संख्या जास्त आहे. मात्र येत्या काही दिवसांत परिस्थिती नियंत्रणात आल्यास दक्षिण आफ्रिकेत आयपीएल आयोजनाबद्दल विचार केला जाऊ शकतो. कारण 2009 साली भारतात निवडणुकांमुळे आयपीएलचे आयोजन दक्षिण आफ्रिकेत करण्यात आले होते. त्यामुळे आयपीएलच्या आयोजनासाठी दक्षिण आफ्रिका हा देखील एक उत्तम पर्याय ठरु शकतो.
 

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

सीएसएमटी आणि सावंतवाडी दरम्यान नवीन नियमित रेल्वेगाडी धावणार

सिद्धिविनायक मंदिरातील १८ कोटी रुपयांची देणगी चोरीचा राज ठाकरेंच्या दाव्यावर राज्य सरकार सक्रिय मोड मध्ये

LIVE: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना 'गुंगी गुडिया' म्हणत काँग्रेसने सोडले टीकास्त्र

मध्य प्रदेश-छत्तीसगडमध्ये रिलायन्स जिओच्या ब्रॉडबँड ग्राहकांची संख्या २१ लाखांच्या पुढे

सिद्धिविनायक दान चोरीच्या वादावर भाष्य करणे संजय राऊतांनी टाळले

पुढील लेख
Show comments