Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सूर्यग्रहण : ग्रहणाच्या वेळी मंदिरं बंद ठेवायला का सांगितलं जातं? यामागे काही कारण आहे?

Updated: मंगळवार, 25 ऑक्टोबर 2022 (15:00 IST)
 
ब्राह्मणांनी दररोज संध्या आणि अग्निहोत्र यांचं पूजन करावं असं म्हटलं आहे. काही ब्राह्मण देवळात काम करतात. ग्रहण काळात अग्निहोत्राची पूजा होऊ शकत नाही. म्हणून ग्रहण काळात मंदिरं बंद ठेवली जातात.
काही आगमांनुसार मंदिरातही अग्निहोत्र करता येऊ शकतं. पण वैदिक शास्त्रामध्ये याबद्दल भिन्न मत आहे.
 
वैदिक शास्त्रानुसार, ब्राह्मण पतीपत्नीने अग्निहोत्राची घरी पूजा करणे आवश्यक असते. ब्राह्मणांनी कर्तव्याचं पालन करावं. स्वधर्माचं पालन न करणारे ब्राह्मणत्व गमावतात. त्यांना मंदिरात पूजा करण्याचा अधिकार मिळत नाही.
 
म्हणूनच ग्रहणाच्या दिवशी मंदिरं बंद ठेवली जातात.
 
'हे' मंदिर ग्रहणातही खुलं असतं
तिरुपती जिल्ह्यातलं श्रीकालहस्ती मंदिर ग्रहण काळातही उघडं असतं. प्राचीन काळापासून ही पद्धत सुरू असल्याचं या मंदिरातील पुजारी सांगतात.
 
मंदिरातील पुजाऱ्यांनी सांगितलं, श्रीकालहस्तीश्वेशरा स्वामी हे शिवाचं नाव आहे.
 
श्री म्हणजे गर्भ. कालम म्हणजे साप. हस्ती म्हणजे हत्ती. या तिन्ही गोष्टींचं पूजन केलं जातं. या तिन्हीचा शिवामध्ये एकत्रीकरण झाल्याचं मानलं जातं.
राहू केतू यांचा मंदिरात अधिवास असतो. श्रीकालहस्ती मंदिर राहू क्षेत्र म्हणून ओळखलं जातं. राहू केतू सूर्य आणि चंद्राची ताकद अंगीकारतात. ग्रहण काळात विशेष पूजा आणि अभिषेक केला जातो. राहू केतू दोष दूर राहावा यासाठी भाविक या मंदिरात येऊन पूजा करतात.
 
स्वामी आणि अम्मा यांचं दर्शनही घेतलं तर राहूकेतू दोषाबरोबरच नवग्रह दोषही जातो अशी श्रद्धा आहे.
 
या मंदिराला 'दक्षिण कैलाश' म्हटलं जातं.
 
स्वामी आणि अम्मा यांचं वास्तव्य या मंदिरात असतं. क्षेत्र पुराणानुसार राहू आणि केतू यांच्यावर शंकराची सत्ता असते.
 
सात ग्रह दिशेने फिरत असतात. राहू आणि केतू उलट दिशेने फिरत असतात.
 
हे अपसव्यक्षेत्र आहे. इथे वेगळी परंपरा आहे. सैवगममधल्या अगोहोरा पद्धतीने
इथल्या देवांना नवग्रहाचं कवच असतं. यामुळे श्रीकालहस्ती मंदिराला ग्रहणदोष नसतो.
 
श्रीकालहस्ती मंदिराचा इतिहास
पुराणानुसार शंकर या मंदिरात वायूच्या इच्छेनुसार वायूलिंग म्हणून अवतरतो. कोळी, साप आणि हत्ती यांची पूजा होत असल्याने हे नाव मिळालं असावं अशीही आख्यायिका आहे. आंध्र प्रदेश सरकारनुसार, श्रीकालहस्ती मंदिर लोकप्रिय होण्याआधी स्थानिक आदिवासी पूजा करत. पल्लव आणि चोळ साम्राज्यातील राजांनी नवव्या शतकात इथे मंदिर बांधलं. कुलटोंग चोल यांनी मंदिराचं गोपूर बांधलं.
 
हे मंदिर विजयनगर 
साम्राज्याचा भाग होतं.1516 मध्ये गजपथांचा पराभव केला तेव्हा कृष्णदेवराय यांनी या मंदिरात राजगोपुरम बांधलं. 1529 मध्ये त्यांच्या मृत्यूनंतर अच्युत राया यांचा इथे राज्याभिषेक झाला.
 
विजयनगर साम्राज्यात शैव आणि वैष्णव पंथाच्या तिरुपती, ताडिपत्री आणि पेनूकोडा या ठिकाणी बांधण्यात आलेल्या मंदिरांच्या शैलीत साधर्म्य आहे.
 
Published By - Priya Dixit 

सर्व पहा

भोळ्या शंकराला प्रसन्न करण्यासाठी श्रावणात करा 'हे' ५ सोपे उपाय; घरात नांदेल सुख-समृद्धी!

श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा Shravan Month 2026 Wishes in Marathi

श्रावणात या 7 गोष्टी घरात आणा, सुख-समृद्धी वाढेल

श्रावणात महिलांनी हिरव्या बांगड्या का घालाव्यात? कारण वाचून थक्क व्हाल

आरती गुरुवारची-निर्गुण गुणवंत तूं विघ्नहारा

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

पुढील लेख
Show comments