Dharma Sangrah

पाच जिल्हे वगळता अन्य कुठेही 'बर्ड फ्लू' चा संसर्ग नाही

शुक्रवार, 15 जानेवारी 2021 (21:37 IST)
राज्यात पाच जिल्हे वगळता अन्य कुठेही 'बर्ड फ्लू' चा संसर्ग झालेला नाही. ज्या कोंबड्यांमध्ये बर्ड फ्लू आढळला त्यांची संख्याही मोजकीच आहे, मात्र नियमानुसार काळजी म्हणून त्याच्या १ किलोमीटर परिघातील सर्व  कोंबड्या नष्ट करण्यात येत असल्याने ती संख्या जास्त वाटते आहे असे स्पष्टीकरण पशूसंवर्धन विभागाच्या वतीने करण्यात आले.
 
राज्यात  लातूर,परभणी, बीड या जिल्ह्यांमधील मृत कोबड्यांचे काही नमुने तपासल्यानंतर त्यांच्यात लागण झाली असल्याचे आढळले. अशा कोंबड्या आढळलेल्या ठिकाणापासून १ किलोमीटरच्या परिसरातील सर्व कोंबड्या नष्ट केले जातात. याचा अर्थ नष्ट झालेल्या सर्वच कोंबड्यांना बर्ड फ्लू झाला होता असा लावता येणार नाही.
 
लातूर मधील त्या ठिकाणच्या पोल्ट्री मधील ३ हजार ४४३, परभणीमध्ये १० हजार व बीडमध्ये ५ हजार कोंबड्या नष्ट करण्यात आल्या. त्यामुळे सध्या राज्यात फार मोठ्या प्रमाणावर बर्ड फ्लू चा प्रादुर्भाव झाला आहे म्हणता येणार नाही असे डॉ. परकाळे यांनी सांगितले.
 

सर्व पहा

मान्सूनमध्ये कार चालवताना 'या' ८ चुका टाळा; नाहीतर होऊ शकते मोठे नुकसान

Birthday Wishes For Sister in Marathi बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

कशेडी घाटात खरंच भूत आहे का ? जाणून घ्या 'त्या' रहस्यमय कथांमागील सत्य!

संत नामदेव महाराज समाधी: इतिहास, महत्त्व आणि नामदेव पायरीची संपूर्ण माहिती

July Monthly Horoscope 2026 मासिक राशिभविष्य: जुलै २०२६ मध्ये 'या' राशींवर होणार धनाचा वर्षाव; तुमचे भाग्य कसे असेल?

सर्व पहा

ठाणे जिल्ह्यातील भिवंडीमध्ये एक खाजगी पर्यटक बस जळून खाक

भारत विरुद्ध इंग्लंडच्या दुसऱ्या टी२० सामन्यावर पावसाचे सावट

LIVE: महाराष्ट्र सरकारने शाळांच्या बाहेर विकल्या जाणाऱ्या उच्च-कॅफीनयुक्त ड्रिंक्सवर कडक भूमिका घेतली

तुमच्या ट्रेन तिकिटावर 'NOBS' असे लिहिलेले का? मुलांचे तिकीट बुक करण्यापूर्वी काही महत्त्वाचे नियम

थायलंडच्या ईशान्य भागात भीषण अपघात 9 बौद्ध भिक्षूंचा मृत्यू

पुढील लेख