Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मनिषा कायंदे तिकडे कशा काय गेल्या, काही कळत नाही : भुजबळ

Updated: सोमवार, 19 जून 2023 (21:18 IST)
 
दरम्यान, ठाकरे गटातील एक-एक आमदार, पदाधिकारी उद्धव ठाकरेंची साथ सोडून जाताना दिसत आहे.  याबाबत पत्रकारांनी विचारले असता छगन भुजबळ म्हणाले की, उद्धव ठाकरे हे ठाकरे गटाचे प्रमुख आहेत. त्यांचा पक्ष सांभाळण्यात ते सक्षम आहेत. त्यांना सल्ला देण्याची आवश्यकता नाही. उद्धव ठाकरे यांच्याकडे जुने नेते, शिवसैनिक आहेत. ते चर्चा करू शकतात. गळती थांबवू शकतात. त्यामुळे त्यांना काही सल्ला देण्याची गरज नाही.
 
शिवसेनेतील तसेच बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबतच्या अनेक जुन्या आठवणींना उजाळा  देतांना ते  म्हणाले की, अजूनही शिवसेना फुटली आहे हे मनाला पटत नाही असेही भुजबळ म्हणाले. १९७३ साली मी पहिल्यांदा नगरसेवक झालो तर १९७८ साली बाळासाहेबांनी मला महानगरपालिकेतील शिवसेनेचा गटनेता केल. आता, जसा वर्धापन दिन होतोय तसाच तेव्हाही व्हायचा, गटनेता झाल्यानंतर बाळासाहेबांनी मला वर्धापन दिन किंवा दसरा मेळावा याठिकाणी बोलण्याची संधी द्यायला सुरुवात केली. त्यानंतर शिवसेनेने अनेक जबाबदाऱ्या दिल्या. महापौर झालो, आमदार झालो. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात शिवसेनेचे काम पोहोचवलं
 
यंदा शिवसेनेचा वर्धापन दिन दोन गटांकडून साजरा केला जातोय. यावर बोलताना भुजबळ म्हणाले की, कोर्टाने किंवा निवडणूक आयोगाने काय निर्णय दिला आहे. यापेक्षा जेव्हा येऊ घातलेल्या वेगवेगळ्या निवडणुका होतील त्यावेळी मतदानाच्या माध्यमातून लोक सांगतील की खरी शिवसेना कोणती आहे. राजकारणी काहीही बोलत असले तरी लोक त्यावर बरोबर लक्ष ठेऊन असतात आणि ठरवत असतात की खर काय आहे, खोट काय आहे, खरे कोण किंवा खोटे कोण आहे.
 
भुजबळ पुढे म्हणाले, आम्ही शिवसैनिक असताना कुठलाही कठीण प्रसंग असो शिवसैनिक ठामपणे बाळासाहेबांच्या पाठीशी उभे असायची, आमची एकी अगदी अभेद्य असायची. एकदा बाळसाहेबांचा शब्द आला की हे करा, की मग काय करू, कस करू, पोलीस येतील का, अटक होईल का असा कुठलाही विचार येत नव्हता. साहेबांचा शब्द सुटला की डू ऑर डाय  अशी परिस्थिती असायची आणि आम्ही तुटून पडायचो. परंतु आता ती शिवसेना काहीशी विस्कळीत व्हायला लागली आहे. परंतु शिवसेना ही अभेद्य रहावी अशी माझी मनोमन इच्छा आहे

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

LIVE: पंढरपूर पुनर्वसन धोरणाला फडणवीस मंत्रिमंडळाची मंजुरी

LIVE: एफडीए आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या जलद धाडींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पाठिंबा मिळाला

मुंबई : तुकाराम मुंडे यांची कठोर कारवाई, ६ आस्थापनांचे परवाने रद्द

रात्रीचा प्रवास अधिक सुलभ होणार, ५० नवीन वंदे भारत स्लीपर गाड्या सुरू होणार

नितीन गडकरी म्हणतात मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग खड्डेमुक्त, पुण्यात ६०,००० कोटी रुपयांचा प्रकल्प प्रस्तावित

पुढील लेख
Show comments