Festival Posters

Essay on My Father :माझे बाबा

Updated: शुक्रवार, 11 जून 2021 (23:22 IST)
 
1 संयम -बाबांमधील सर्वात महत्वपूर्ण गुण आहे धैर्य किंवा संयम ,ते नेहमी संयमाने कोणतीही परिस्थितीला व्यवस्थितपणे हाताळतात.कोणतीही परिस्थिती असो ते कधी चिडत नाही .आपल्यावर ताबा ठेवून ते परिस्थितीतून योग्य मार्ग काढून त्यातून पुढे वाढतात.कितीही गंभीर प्रकरणे असो ते नेहमी धैर्य आणि संयम ठेवतात.
 
 2 शांत-आपण बाबांकडून शिकले आहोत कोणत्याही परिस्थितीत शांत राहणे.कधीही रागाच्याभरात येऊन काहीही करू नका.जेणे करून नंतर पश्चाताप करण्याची वेळ येईल.बाबा नेहमीच संयमाने शांत राहून युक्तीने प्रत्येक कार्य यशस्वीरीत्या पार पाडतात.ते आई वर किंवा आमच्यावर उगाचच रागावत नाही.
 
3 शिस्त- वडील आपल्याला नेहमीच शिस्तीत राहायला शिकवतात आणि ते स्वत: देखील शिस्तबद्ध असतात. सकाळपासून रात्री पर्यंत त्याची संपूर्ण दिनचर्या शिस्तबद्ध आहे. रोजच्या कामातून निवृत्त झाल्यावर ते सकाळी उठतात आणि ऑफिसात जातात संध्याकाळी घरी येतात.दररोज आम्हाला वेळ देतात आणि बागेत फिरायला नेतात.नंतर आमचा अभ्यास घेतात.
 
4 गांभीर्य -बाबा नेहमी घरातील सर्व कामांकडे आणि कुटुंबियातील सर्व सदस्यांच्या आरोग्याला घेऊन नेहमी गंभीर आहे.ते अगदी छोट्या-छोट्या गोष्टींकडे बारीक लक्ष देतात.ते कधीही त्याकडे दुर्लक्ष करत नाही तर आम्हाला त्याचे महत्व समजावतात.
 
5 प्रेम-  बाबा आपल्या मुलांवर खूप प्रेम करतात ते आपल्या मुलांना कोणत्याच गोष्टीची कमी पडू देत नाही.मुलांच्या सर्व गरजा पूर्ण करतात.मुलांकडून   काहीही चुकले तर ते रागावत नाही तर प्रेमाने मुलांना समजवतात.आणि पुन्हा तशी चूक न करण्याची शिकवण देतात.
 
 
6 मोठे मन -बाबांचे मन खूप मोठे आहे,बऱ्याच वेळा त्यांच्या कडे पैसे नसताना देखील ते आमच्या सर्व गरजा पूर्ण करतात.ते आम्हाला कोणत्याच गोष्टीसाठी कधीही कमी पडू देत नाही.मुलांनी काही चूक केली तर त्यांना काही काळ रागावून क्षमा करून देतात.
 
ते त्यांचा त्रास कोणाला सांगत नाही ते घरातील प्रत्येकाच्या गरज पूर्ण करण्याची काळजी घेतात.त्यांच्यातील हेच वैशिष्टये त्यांना खूप मोठं बनवतात.त्यांची तुलना जगातील कोणाशीही केली जाऊ शकत नाही.
 
बाबा हे प्रयेक मुलासाठी साक्षात देवाचे रूप आहे.ते आपल्या मुलांना सुख देण्यासाठी स्वतःचे सुख विसरतात.ते दिवसरात्र आपल्या मुलांसाठी काम करतात. बऱ्याच वेळा आपल्या मुलांना चांगले शिकविण्यासाठी स्वतः कर्जबाजारी होतात.परंतु आपल्या मुलांना नेहमी सुखी ठेवण्यासाठी धडपड करतात. त्यांना होणार त्रास ते कोणालाच सांगत नाही.म्हणून बाबा या जगात सर्वात महत्वाचे आहेत.
 
 
 

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सर्व पहा

गणेशोत्सवात मंडपात 'महाप्रसाद' वाटण्यापूर्वी सावधगिरी बाळगा, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागू शकते

ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीदरम्यान दोन गटांत झालेल्या संघर्षानंतर मुंबईच्या परळ भागात तणाव

महाराष्ट्रात H1N1 इन्फ्लूएंझाचा प्रादुर्भाव वाढला; १,१०९ रुग्णांची नोंद, त्यापैकी ६५% रुग्ण पुणे आणि मुंबईतील

Central Railway Updates: टिटवाळा स्थानकावर २८ ऑगस्टपासून १५ दिवसांचा 'मेगा ब्लॉक'; अनेक लोकल गाड्या रद्द होणार

नेपाळमधील पुरामुळे हत्ती वाहून भारतात आले; त्यांची अवस्था पाहून लोकांचे मन हेलावले

पुढील लेख
Show comments