suvichar

म्हणून केले जाते गणेश प्रतिमेचे विसर्जन

सोमवार, 9 सप्टेंबर 2019 (14:00 IST)
देवांमध्ये गणपतीला अग्र पूज्य मानले जाते. गणपतीला बुद्धीचे देवता मानले गेले आहे. प्रत्येक मंगल कार्यात त्याला प्रथम स्थान मिळालेला आहे. गणपती जल तत्त्वाचे अधिपती आहे. हेच कारण आहे की अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपतीची पूजा-अर्चना करून  गणपती-प्रतिमेचे विसर्जन केले जाते.  
 
धार्मिक ग्रंथानुसार महर्षी वेदव्यासजींनी गणेश चतुर्थीपासून लागोपाठ दहा दिवसांपर्यंत महाभारताची कथा गणपतीला ऐकवली होती. याला गणपतीने अक्षरशः: लिहिली होती. जेव्हा वेदव्‍यास कथा सुनावतं होते तेव्हा त्यांनी आपले डोळे बंद ठेवले होते. त्यांना हे माहीत पडले नाही की या कथेचे गणपतीवर काय प्रभाव पडत आहे.  
 
जेव्हा महर्षीने कथा पूर्ण करून डोळे उघडले तेव्हा त्यांनी बघितले की 10 दिवसांपासून कथा ऐकल्याने गणपतीचा तापमान फार वाढला होता. त्यांना ताप आला होता. महर्षी वेदव्‍यासजींनी गणपतीला जवळच्या कुंडांत डुबकी लावायला सांगितली ज्याने त्यांच्या शरीरातील तापमान थोडा कमी झाला. असे मानले जाते की गण‍पति गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशीपर्यंत सगुण साकार रूपात या मूर्तीत स्थापित राहतात, ज्याला गणपती उत्सवाच्या दरम्यान स्थापित केले जाते.  
 
मान्‍यता अशी आहे की गणपती उत्सवाच्या दरम्यान लोक आपल्या सर्व इच्छा गणपतीच्या कानात सांगतात. गणेश स्थापने नंतर 10 दिवसांपर्यंत गणपती लोकांची इच्छा ऐकता ऐकता एवढे गरम होऊन जातात की चतुर्दशीला वाहत्या पाण्यात विसर्जित करून त्यांना शीतल करण्यात येते.  
 
गणपती बाप्पाशी निगडित मोऱ्या नावामागे गणपतीचे मयूरेश्वर स्वरूप मानले जाते. गणेश-पुराणानुसार सिंधू नावाच्या दानवाच्या अत्याचारापासून बचाव करण्यासाठी देवगणांनी गणपतीचे आव्हान केले. सिंधूचा संहार करण्यासाठी गणपतीने मयुराला वाहन निवडले आणि सहा भुजांचा अवतार धारण केला. या अवताराची पूजा भक्त गणपती बाप्पा मोऱ्याच्या जयघोषासोबत करतात.  

सर्व पहा

श्री गजानन महाराज गुरुवार व्रत

आरती गुरुवारची-निर्गुण गुणवंत तूं विघ्नहारा

Jamai Sasthi 2026 जावई षष्ठी कुठे, कधी आणि का साजरा केली जाते? जाणून घ्या पारंपरिक माहिती

Shegaon Gajanan Maharaj Aarti शेगावच्या माऊलींची श्री गजानन महाराजांची आरती

Guru Arjan Dev तप्त तव्यावर बसवून अंगावर जळती वाळू ओतली तरी ढळली नाही श्रद्धा

सर्व पहा

प. पू. सदगुरु श्री जनार्दन स्वामी खेर: एक अलौकिक ईश्वरी शक्ती आणि तारणहार

Bhakti Katha हनुमानजींच्या श्वासातून उमटली रामधून: महादेव-पार्वतींसह सबंध देवलोक डोलला!

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?

पावसाळ्यात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी घरी ही ५ झाडे लावा

१५ जूनपासून ३ ग्रहांची दुर्मिळ युती! या राशींचे चमकणार भाग्य, होणार प्रचंड धनलाभ!

पुढील लेख
Show comments